शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:52 IST

मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजणांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीने यश संपादन केल्यानंतर या दोन्ही पक्षात सत्तासंघर्ष सुरु आहे. मात्र असे असतानाच या दोन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिपदाचे स्वप्न पडत आहे. मुख्यमंत्री कुणाचा होणार याबाबत अजून संभ्रम आहे. पक्षपातळीवर हा घोळ सुरू असताना राज्यातील भाजप-शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक आमदार मुबईत ठाण मांडून बसले आहेत, तर काही जणांचे अप-डाऊन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून ह्या दोन्ही पक्षात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरीही युतीचेच सरकार येणार असल्याचा दावा सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र असे असताना दोन्ही पक्षाकडून सत्तास्थापन करण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी ह्या साठी निवडून आलेल्या आमदारांकडून मोर्चेबांधणी सुरु असून, इच्छुक आमदार मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

गेल्यावेळी मंत्रिमंडळात असलेले आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांकडून सुद्धा,  पुन्हा मंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. मात्र भाजप-सेनेत सुरु असलेल्या वादामुळे या इच्छुकांचा हिरमोड होताना दिसत आहे. मात्र या दोन्ही पक्षातील वाद कोणत्याही क्षणी मिटू शकतो, आणि तसे झाल्यावर मंत्रिमंडळातील आपली संधी जाऊ नयेत म्हणून अनेक आमदारांनी आठवड्याभरापासून मुबईत मुक्काम ठोकला असल्याचे पाहायला मिळत आहे.