शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:52 IST

मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजणांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीने यश संपादन केल्यानंतर या दोन्ही पक्षात सत्तासंघर्ष सुरु आहे. मात्र असे असतानाच या दोन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिपदाचे स्वप्न पडत आहे. मुख्यमंत्री कुणाचा होणार याबाबत अजून संभ्रम आहे. पक्षपातळीवर हा घोळ सुरू असताना राज्यातील भाजप-शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक आमदार मुबईत ठाण मांडून बसले आहेत, तर काही जणांचे अप-डाऊन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून ह्या दोन्ही पक्षात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरीही युतीचेच सरकार येणार असल्याचा दावा सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र असे असताना दोन्ही पक्षाकडून सत्तास्थापन करण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी ह्या साठी निवडून आलेल्या आमदारांकडून मोर्चेबांधणी सुरु असून, इच्छुक आमदार मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

गेल्यावेळी मंत्रिमंडळात असलेले आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांकडून सुद्धा,  पुन्हा मंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. मात्र भाजप-सेनेत सुरु असलेल्या वादामुळे या इच्छुकांचा हिरमोड होताना दिसत आहे. मात्र या दोन्ही पक्षातील वाद कोणत्याही क्षणी मिटू शकतो, आणि तसे झाल्यावर मंत्रिमंडळातील आपली संधी जाऊ नयेत म्हणून अनेक आमदारांनी आठवड्याभरापासून मुबईत मुक्काम ठोकला असल्याचे पाहायला मिळत आहे.