शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:52 IST

मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजणांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीने यश संपादन केल्यानंतर या दोन्ही पक्षात सत्तासंघर्ष सुरु आहे. मात्र असे असतानाच या दोन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिपदाचे स्वप्न पडत आहे. मुख्यमंत्री कुणाचा होणार याबाबत अजून संभ्रम आहे. पक्षपातळीवर हा घोळ सुरू असताना राज्यातील भाजप-शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक आमदार मुबईत ठाण मांडून बसले आहेत, तर काही जणांचे अप-डाऊन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून ह्या दोन्ही पक्षात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरीही युतीचेच सरकार येणार असल्याचा दावा सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र असे असताना दोन्ही पक्षाकडून सत्तास्थापन करण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी ह्या साठी निवडून आलेल्या आमदारांकडून मोर्चेबांधणी सुरु असून, इच्छुक आमदार मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

गेल्यावेळी मंत्रिमंडळात असलेले आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांकडून सुद्धा,  पुन्हा मंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. मात्र भाजप-सेनेत सुरु असलेल्या वादामुळे या इच्छुकांचा हिरमोड होताना दिसत आहे. मात्र या दोन्ही पक्षातील वाद कोणत्याही क्षणी मिटू शकतो, आणि तसे झाल्यावर मंत्रिमंडळातील आपली संधी जाऊ नयेत म्हणून अनेक आमदारांनी आठवड्याभरापासून मुबईत मुक्काम ठोकला असल्याचे पाहायला मिळत आहे.