शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

शिरूर लोकसभेच्या जागेवर नवा ट्विस्ट; आढळराव पाटील अजित पवार गटासोबत जाणार? मतदारसंघात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 12:41 IST

शिरूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचाच अवधी असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अलीकडच्या काळात राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे मतदारसंघांतील समीकरणे बदलली असून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरेंना आव्हान देत वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. मात्र ज्या लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील तीन वेळा खासदार राहिले आहेत, त्या शिरूर लोकसभेवर  भाजपकडूनही दावा सांगितला जात आहे. भाजप आमदार महेश लांडगे हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा कायम रंगत असते. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे कोल्हे यांच्याविरोधात लढण्यासाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही विचार करू शकतात. 

दरम्यान, याबाबतच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या चर्चेवर मी आताच काही प्रतिक्रिया देणार नसल्याचं आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात ते नक्की काय राजकीय भूमिका घेतात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मार्ग निवडतात का, हे पाहावं लागेल.

शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काय घडलं?

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरातील बहुसंख्य मतदारसंघांवर भाजप-शिवसेना या युतीने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ज्या मोजक्या जागांवर यश मिळवता आलं, त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लाभलेली लोकप्रियता आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीच्या जोरावर अमोल कोल्हे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र पराभवानंतर मागील पाच वर्षांत आढळराव पाटील यांनी वारंवार मतदारसंघ पिंजून काढला असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShirurशिरुरlok sabhaलोकसभा