शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

नव्याने टोल, रेतीवर जीएसटी; राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:04 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या २०२०-२१च्या अपेक्षित उत्पन्नात तब्बल १ लाख १२ हजार कोटी रुपयांची तूट येणार

- यदु जोशीमुंबई : राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही वाहनांवर नव्याने टोल सुरू करावा, परराज्यातून येणाऱ्या रेतीवर ३० टक्के जीएसटी आकारावा, शासकीय योजनांची पुनरावृत्ती बंद करून खर्चात कपात करावी यासह विविध उपाययोजनांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या २०२०-२१च्या अपेक्षित उत्पन्नात तब्बल १ लाख १२ हजार कोटी रुपयांची तूट येणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि ती सुधारायची तर कठोर उपाययोजना व निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागाच्या सादरीकरणादरम्यान व्यक्त केले.राज्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे सादरीकरण आणि त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल अडीच तास चर्चा चालली. यंदाच्या आर्थिक वर्षात राज्याचे उत्पन्न ३ लाख ३४ हजार कोटी इतकी अपेक्षित होते मात्र ते २ लाख ३४ हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकेल, असा अंदाज आहे. विविध विभागांच्या खर्चाला या आधीच कट लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी मेमध्ये वित्त विभागाने असा आदेश काढला की, अर्थसंकल्पीय तरतुदींच्या केवळ ३३ टक्के निधी खर्च करावा आणि त्यात सर्व योजना बसवाव्यात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भांडवली खर्च ५० टक्‍क्‍यांपर्यंत करता येईल आणि नवीन योजनादेखील हाती घेता येतील, अशी सूट देण्यात आली.आगामी दोन महिन्यांत विविध विभागांना अत्यंत काटकसरीने खर्च करावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. शासकीय योजनांवर होणारा खर्च आणि प्रत्यक्ष लाभार्थींना त्यापासून होणारा फायदा याचे परिणामकारक सनियंत्रण ठेवून निधीचा अपव्यय होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा वित्त विभागाने आग्रह धरला. काही प्रकारच्या वाहनांना सरसकट टोलमाफी देण्यात आली आहे, त्याचा पुनर्विचार करण्याची सूचना सादरीकरणात आली, असे सूत्रांनी सांगितले.जानेवारीपर्यंत राज्याचे उत्पन्न १ लाख ८० हजार कोटी इतके होते. त्यात फार तर ५० हजार कोटी रुपयांची वाढ होऊ शकेल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. जीएसटीमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे. याशिवाय मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क आणि परिवहन शुल्कात मोठी तूट येणार आहे.अन्य विभागांच्या खर्चात कपातगृह, आरोग्य यासारख्या अत्यावश्यक सेवांशी निगडित विभाग वगळता अन्य विभागांच्या खर्चात मोठा कट लावावा लागेल, असे वित्त विभागाकडून व्यक्त करण्यात आले. लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, मात्र ती पूर्णपणे रुळावर आलेली नाही.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प