शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नव्याने टोल, रेतीवर जीएसटी; राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:04 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या २०२०-२१च्या अपेक्षित उत्पन्नात तब्बल १ लाख १२ हजार कोटी रुपयांची तूट येणार

- यदु जोशीमुंबई : राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही वाहनांवर नव्याने टोल सुरू करावा, परराज्यातून येणाऱ्या रेतीवर ३० टक्के जीएसटी आकारावा, शासकीय योजनांची पुनरावृत्ती बंद करून खर्चात कपात करावी यासह विविध उपाययोजनांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या २०२०-२१च्या अपेक्षित उत्पन्नात तब्बल १ लाख १२ हजार कोटी रुपयांची तूट येणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि ती सुधारायची तर कठोर उपाययोजना व निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागाच्या सादरीकरणादरम्यान व्यक्त केले.राज्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे सादरीकरण आणि त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल अडीच तास चर्चा चालली. यंदाच्या आर्थिक वर्षात राज्याचे उत्पन्न ३ लाख ३४ हजार कोटी इतकी अपेक्षित होते मात्र ते २ लाख ३४ हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकेल, असा अंदाज आहे. विविध विभागांच्या खर्चाला या आधीच कट लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी मेमध्ये वित्त विभागाने असा आदेश काढला की, अर्थसंकल्पीय तरतुदींच्या केवळ ३३ टक्के निधी खर्च करावा आणि त्यात सर्व योजना बसवाव्यात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भांडवली खर्च ५० टक्‍क्‍यांपर्यंत करता येईल आणि नवीन योजनादेखील हाती घेता येतील, अशी सूट देण्यात आली.आगामी दोन महिन्यांत विविध विभागांना अत्यंत काटकसरीने खर्च करावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. शासकीय योजनांवर होणारा खर्च आणि प्रत्यक्ष लाभार्थींना त्यापासून होणारा फायदा याचे परिणामकारक सनियंत्रण ठेवून निधीचा अपव्यय होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा वित्त विभागाने आग्रह धरला. काही प्रकारच्या वाहनांना सरसकट टोलमाफी देण्यात आली आहे, त्याचा पुनर्विचार करण्याची सूचना सादरीकरणात आली, असे सूत्रांनी सांगितले.जानेवारीपर्यंत राज्याचे उत्पन्न १ लाख ८० हजार कोटी इतके होते. त्यात फार तर ५० हजार कोटी रुपयांची वाढ होऊ शकेल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. जीएसटीमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे. याशिवाय मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क आणि परिवहन शुल्कात मोठी तूट येणार आहे.अन्य विभागांच्या खर्चात कपातगृह, आरोग्य यासारख्या अत्यावश्यक सेवांशी निगडित विभाग वगळता अन्य विभागांच्या खर्चात मोठा कट लावावा लागेल, असे वित्त विभागाकडून व्यक्त करण्यात आले. लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, मात्र ती पूर्णपणे रुळावर आलेली नाही.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प