शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पिढीची नवी पत्रकारिता जोमात

By admin | Updated: June 10, 2017 01:00 IST

पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार

पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार आणि तंत्रज्ञान यामुळे स्वत:चे वर्तमानपत्र काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आहे. वर्तमानपत्राच्या जोडीला आता वेबसाइट काढणे, यूट्यूब चॅनल काढणे, सोशल मीडियावर माहितीचा प्रसार करणे इत्यादीसुद्धा करता येते.बिन जेफ्रीच्या ‘इंडियाज न्यूजपेपर रेव्हल्यूशन’ या पुस्तकात तो दाखवतो की भांडवलशाही आणि माहिती व माध्यम तंत्रज्ञानामुळे भारतात वर्तमानपत्रांची कशी क्रांती होते आहे. भारतातील वर्तमानपत्रांचे जग हे जगातील इतर देशांपेक्षा फार वेगळे आहे. भाषा, विषय, कुठल्या घटनांचे रूपांतर बातमीत कशामुळे होते, वाचकांचा सामाजिक, राजकीय कल आणि आर्थिक परिस्थिती याचे जितके वैविध्य भारतात दिसते, तितके ते जगात इतरत्र कुठेही आढळत नाही.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस सर्वाधिक लोक निरक्षर होते. साक्षरता हा युरो-अमेरिकन जगातील आधुनिक विचार. त्याचबरोबर सर्वाधिक लोक गरीब होते. ही गरिबी जवळ जवळ हजार वर्षांची होती. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळची आपली शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार इत्यादींची धोरणे त्या वास्तवाला धरून होती. आज परिस्थिती बदलली आहे. अर्ध्याहून अधिक लोक आता साक्षर आहेत. या समाजाने औपचारिक शिक्षण घेतले आहे. यात दिवसेंदिवस झपाट्याने भर पडत चालली आहे. याचा अर्थ येत्या दशकात भारतातील सर्वाधिक लोकसंख्या औपचारिक शिक्षण घेतलेली असेल.भारतातील औपचारिक शिक्षण हे सर्वाधिक प्रमाणात सरकार देत होते. त्यामुळे औपचारिक शिक्षणाचा रोजगाराशी संबंध जोडण्याचे काम सरकारनेच केले. सरकारनेच सर्वाधिक रोजगार पुरविला. मात्र तसे करताना निकष सामाजिक आणि राजकीय लावले गेले. विषयज्ञान, अनुभव, कसब, कुशलता हे गौण होते. हळूहळू मात्र सरकारला हे ओझे पेलेनासे झाले आणि मग रीतसर नोकरकपातीला सुरुवात झाली. याच वेळी औपचारिक शिक्षण देणारी खाजगी यंत्रणा सुरू झाली. अर्थात ही बाहेरून जरी खाजगी वाटत असली तरी यामागे राजकारणी मंडळीच होती. आता यात व्यापारी आणि दुकानदार मंडळी आली आहेत. एक छोटा गट आहे धार्मिक संस्थांचा जो औपचारिक शिक्षणात काम करतो. मात्र हे सगळे जरी असले तरी रोजगारनिर्मिती अजूनही सरकारच करते आहे. आयटी क्षेत्र वगळता खाजगी क्षेत्र यात फारसे प्रभावी नाही. पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार आणि तंत्रज्ञान यामुळे स्वत:चे वर्तमानपत्र काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आहे. वर्तमानपत्राच्या जोडीला आता वेबसाइट काढणे, यूट्यूब चॅनल काढणे, सोशल मीडियावर माहितीचा प्रसार करणे इत्यादीसुद्धा करता येते. यामुळे अनेक तरुण आता स्वत:चे वर्तमानपत्र काढताहेत. त्यांचे विषय, विषय हाताळणी, भाषा, वाचक, बातमीमूल्ये वेगवेगळी आहेत. आजपर्यंत भाषा, विषय, मूल्ये, नैतिकता, आर्थिक व व्यापारी गणिते, राजकीय आणि सामाजिक जबाबदारीच्या ज्या चौकटीत वर्तमानपत्रे वावरत होती ती सगळीच्या सगळी या नवीन पिढीने झुगारून देऊन स्वत:ची नवीन पत्रकारिता करायला सुरुवात केली आहे.या सर्व प्रक्रियेतून जाताना भारतात संपूर्णपणे नवीन ‘नॅरेटिव्ह’ तयार होताहेत. पत्रकारितेतून समाज आपली कथा मांडत असतो. वर्तमानपत्र समाजाची अभिव्यक्ती असते. समाज आपले वास्तव मांडत असतो, ते वास्तव बदलत असते, त्यातून समाज शिकत जातो. प्रत्येक समाजाची चांगल्या जीवनाची स्वत:ची व्याख्या असते. ही व्याख्या आता बदलते आहे.या सगळ्यातून पैसा मिळेल काय? याचे उत्तर पैसा कशासाठी हवा आहे, या प्रश्नात आहे. या सगळ्यातून पुस्तके विकत घेण्यासाठी, प्रवास करण्यासाठी, माणसे जोडण्यासाठी, समाज, राजकारण, अर्थकारण समजण्यासाठी, समाजात प्रतिष्ठा मिळविण्यासाठी, माणूस म्हणजे काय हे समजण्यासाठी, आत्मभान मिळविण्यासाठी लागतो तेवढा पैसा आहे.मग पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घ्यावे काय? तर निश्चित घ्यावे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की भारतातील औपचारिक शिक्षणाला संस्थांच्या मर्यादा असतात. प्रत्येक संस्थेच्या स्वत:च्या मर्यादा असतात. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्याला हे भान असले पाहिजे की अभ्यासक्रमाचा सर्वाधिक उपयोग त्याला स्वत:ला करायचा आहे. तो कसा, कशासाठी, किती करायचा हे जर निश्चित असेल तर कुठलाही अभ्यासक्रम कुठल्याही संस्थेत राबविला जात असला तरी त्यातून आपल्याला काय हवे आहे ते निश्चित काढता येते. औपचारिक शिक्षणाचा थेट संबंध रोजगाराशी आहे आणि प्रत्येक रोजगार क्षेत्र विशिष्ट आर्थिक चक्रात फिरत असते. त्यामुळे सध्या रोजगार कुठल्या परिस्थितीत आहे व आपण क्षेत्रात येऊ त्या वेळेस तो कुठल्या परिस्थितीत असेल याचे निश्चित भान मिळविणे आवश्यक असते. ते भान त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून मिळविता येते. टीप- सर्व प्रमुख विद्यापीठांसह प्रमुख महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पत्रकारितेचे धडे गिरवता येऊ शकतात. कोर्सेस आणि अभ्यासक्रमाची विपुल माहिती इंटरनेटवरून मिळवणे सहज शक्य आहे.- डॉ. संजय रानडेलेखक मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख आहेत