शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नवी कोरी पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 04:27 IST

बालभारती : राज्यभरातील शाळांना आतापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा

मुंबई : राज्यातल्या अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत. राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीने तब्बल ६ कोटी ३ लाख ७९ हजार ६९१ पुस्तकांचा पुरवठा सर्व जिल्ह्यांतील शाळांना केला आहे. त्यामुळे राज्यातील मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या अनुदानित शाळांना आत्तापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा पूर्ण झाला आहे.

ग्रेटर मुंबई, पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबईत मिळून यंदा ३८ लाख १० हजार ६५१ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३७ लाख ६९ हजार ६०८ पुस्तकांचे वाटप बालभारतीकडून करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील अनेक शाळांत पुस्तकांचे १०० टक्के वाटप झाले आहे.

पुस्तकांचे वाटप करण्यात आलेल्या शाळांमध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीकोरी पुस्तके मिळणार आहेत.

दरम्यान, पुस्तकांची सगळ्यात जास्त मागणी नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिकेकडून बालभारतीकडे करण्यात आली होती, अशी माहिती बालभारतीतर्फे देण्यात आली.

मोफत पुस्तके का देतात?मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी; तसेच विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात.

टॅग्स :Educationशिक्षण