शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नवी कोरी पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 04:27 IST

बालभारती : राज्यभरातील शाळांना आतापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा

मुंबई : राज्यातल्या अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत. राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीने तब्बल ६ कोटी ३ लाख ७९ हजार ६९१ पुस्तकांचा पुरवठा सर्व जिल्ह्यांतील शाळांना केला आहे. त्यामुळे राज्यातील मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या अनुदानित शाळांना आत्तापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा पूर्ण झाला आहे.

ग्रेटर मुंबई, पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबईत मिळून यंदा ३८ लाख १० हजार ६५१ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३७ लाख ६९ हजार ६०८ पुस्तकांचे वाटप बालभारतीकडून करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील अनेक शाळांत पुस्तकांचे १०० टक्के वाटप झाले आहे.

पुस्तकांचे वाटप करण्यात आलेल्या शाळांमध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीकोरी पुस्तके मिळणार आहेत.

दरम्यान, पुस्तकांची सगळ्यात जास्त मागणी नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिकेकडून बालभारतीकडे करण्यात आली होती, अशी माहिती बालभारतीतर्फे देण्यात आली.

मोफत पुस्तके का देतात?मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी; तसेच विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात.

टॅग्स :Educationशिक्षण