शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

न्युरोलॉजिस्ट गिरधर टावरी यांचे निधन

By admin | Updated: June 19, 2015 02:45 IST

सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे (सिम्स) संचालक तथा प्रख्यात न्युरोलॉजिस्ट डॉ. गिरधर मदनगोपाल ऊर्फ जी.एम. टावरी

नागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे (सिम्स) संचालक तथा प्रख्यात न्युरोलॉजिस्ट डॉ. गिरधर मदनगोपाल ऊर्फ जी.एम. टावरी यांचे गुरुवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते़ त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा डॉ. प्रणय यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या मागे मुलगी प्रीती राठी व मोठा आप्तपरिवार आहे. मध्यभारतातील न्युरोलॉजी चिकित्सकामधील प्रथम प्रवर्तक, उत्कृष्ट चिकित्सक व ज्ञानाचा सागर असा त्यांचा नावलौकिक होता. मध्य प्रदेशातील सौंसर तालुक्यातील पारडसिंगा या छोट्याशा गावात १ जून १९३२ रोजी टावरी यांचा जन्म झाला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातून १९५७ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्र म पूर्ण केल्यानंतर १९६० मध्ये त्यांनी मेडिसीनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. मेंदूच्या कार्यातील गुंतागुंत आणि त्यामुळे उद्भवणारे विविध आजार हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या ओढीतूनच त्यांनी तामिळनाडूमधील वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेज येथून न्युरोलॉजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९६२ ते १९७३ पर्यंत या कॉलेजमध्ये त्यांनी सेवा दिली. नागपूरमध्ये त्यांनी गोपीकृष्ण टावरी चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत १९८२ मध्ये बजाजनगर येथे सिम्स हॉस्पिटल सुरू केले. हे रुग्णालय म्हणजे गरिबांच्या मेंदूला जडणाऱ्या आजारांवर माफक दरांत उपचार करणारा एकमेव आधार बनले आहे. (प्रतिनिधी) वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व पडद्याआड गेले - विजय दर्डा डॉ.जी.एम. टावरी यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व पडद्याआड गेले, अशी शोकसंवेदना लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, डॉ. टावरी यांनी नेहमी मानवतेवर भर दिला. आपल्या वैद्यकीय सेवेत त्यांनी कधीही व्यावसायिकपणा येऊ दिला नाही. नागपुरातील सिम्स हॉस्पिटल ही त्यांच्या कार्याची पावती होय. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासोबतच वैयक्तिक हानी झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. धन्वंतरीला मुकलोडॉ. जी.एम. टावरी यांच्या निधनाने समर्पित भावनेने काम करणाऱ्या ज्येष्ठ धन्वंतरीला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, सिम्सची स्थापना करून परिणामकारक उपचारांबरोबरच संशोधनाची सोय उपलब्ध करून दिली. रु ग्णसेवेचे आपले व्रत त्यांनी अखेरपर्यंत जपले.