शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या समाजातील स्त्रियांची अगतिकता दुर्लक्षित

By admin | Updated: August 20, 2014 00:27 IST

भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे जीवन लाचार आणि अगतिक आहे. या स्त्रियांची अगतिकता, असाह्यता मला अस्वस्थ करीत आली आहे.

पुणो : ‘‘भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे जीवन लाचार आणि अगतिक आहे. या स्त्रियांची अगतिकता, असाह्यता मला अस्वस्थ करीत आली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक पातळीवर या स्त्रियांचे प्रश्न कधीच चर्चेत आले नाही,’’ अशी खंत विद्रोही स्त्री साहित्य-संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा, भटक्या विमुक्त स्त्री चळवळीच्या भाष्यकार विमल मोरे यांनी व्यक्त केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आयोजित पहिले विद्रोही स्त्री साहित्य-संस्कृती संमेलनाचे उद्घाटन जाती, वर्ग, स्त्री दास्याच्या बेडय़ा तोडून करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर, स्त्रीवादी समीक्षक मीरा वेलायुधन, ऊर्मिला पवार, गझलकार डॉ. अजीज नदाफ, कॉ. साजूबाई गावित, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित होत्या.
मोरे म्हणाल्या, ‘‘भटक्या-विमुक्त जमातींमधील स्त्रियांना आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रय} करण्याची गरज आहे. राज्यव्यवस्था, शासनव्यस्था, त्याचबरोबर समाजाने पुढे येण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले. भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांच्या वाटय़ाला येणारं नरकप्राय जिणं स्थिर समाजाला अद्याप अपरिचित आहे. सामाजिक, राजकीय, स्त्रीमुक्तीच्या चळवळी, महिलांचे आरक्षण या स्त्रियांच्या हक्काविषयी कसलीही गंधवार्ता या समाजाला नाही. त्यांच्यामध्ये अशी जाणीव व्हावी, असा प्रय}ही होताना दिसत नाही.  अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा दारिद्रय़ाच्या गर्तेत अडकलेल्या या जमातीतील स्त्रियांना माणूस म्हणून स्थान कधी मिळेल, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. 
मुक्ता मनोहर म्हणाल्या, ‘‘भटक्या विमुक्त समाजाला शिक्षण देण्याची गरज आहे. स्त्रियांना संघटित करून, प्रबोधन करून विद्रोही क्षितिजे वाढवावी लागणार आहेत.’’ मीरा वेलायुधन, ऊर्मिला पवार, डॉ. हजीज नदाफ यांनीही मनोगते व्यक्त केली. 
प्रास्ताविक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मेघना भोसले यांनी केले, तर डॉ. रेहना बेग यांनी आभार मानले. (प्रतिनिथी)
 
4भटक्या विमुक्त जमातीमधील लेखकांनी, आत्मकथनाच्या रूपाने आपापल्या जमातींचे जीवन रेखाटले आहे. त्यामधील स्त्रियांच्या प्रश्नाकडे, त्यांच्या अगतिक, असहाय जीवनाकडे गंभीरपणो पाहिले असल्याचे दिसून येत नाही. मी कसा घडत गेलो, याचेच प्रामुख्याने चित्रण झालेले दिसून येते. पुरुषप्रधान संस्कृती, जातपंचायत जोर्पयत समूळ नष्ट होणार नाही, तोर्पयत स्त्रियांचा विकास होणार नाही.