शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नीट परीक्षा : विद्यार्थ्यांच्या कॉलर, बाह्या कापल्या, राज्यभर गोंधळात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:07 IST

नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले.

पुणे : नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले.सोलापूर येथून पुण्यातील परीक्षा केंद्रावर येण्यास केवळ तीन मिनिटे उशीर झाला म्हणून एकाला परीक्षेला मुकावे लागले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी कडक नियमावली केली होती. ड्रेस कोडसह केंद्रात पेन, घड्याळ, पाण्याची बाटली तसेच इतर साहित्य केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. वेळेच्या बाबतीतची काटेकोर सूचना देण्यात आल्या होत्या. पण अनेक विद्यार्थ्यांनी ड्रेस कोड तसेच वेळ पाळली नाही. परीक्षा सुरू होण्याची वेळ सकाळी १० असली तरी विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९.३० असे दोन गटात विभागण्यात आले होते. त्यांच्या प्रवेश पत्रावरही तसे नमुद केले आहे.परीक्षा केंद्रावर पोहचण्यास केवळ तीन मिनिटे उशीर झाला तरी केंद्रात प्रवेश दिला नाही, असा दावा सोलापूर येथून पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या माऊली कारंडे या विद्यार्थ्याने केला आहे. त्याच्यासह अन्य काही केंद्रांवरही विद्यार्थी ९.३० नंतर आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला. ड्रेस कोडमध्ये कॉलर, फुल बाह्याचा शर्ट घालू नये, असे म्हटले होते. औंध येथील केंद्रावर विद्यार्थ्याचा बटन असलेला शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगण्यात आले. त्याचे बनियनवरील छायाचित्रही काढण्यात आले. त्यामुळे तो परीक्षेपूर्वीच निराश झाला होता. तेथील एकाने जवळील दुसरा टी-शर्ट त्याला दिला. या केंद्रावर फुल बाह्याचा शर्ट घालून आलेल्या एका विद्यार्थ्याच्या शर्टच्या बाह्या कापण्यात आल्याचे या केंद्रातील विद्यार्थ्याने सांगितले. पिंपळे सौदागर येथील परीक्षा केंद्रांवर आलेल्या काही विद्यार्थ्यांची कॉलर कापून त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. बहुतेक केंद्रांवर मंडळाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले.पाण्याची अपुरी सुविधाकाही परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बाणेर येथील केंद्रावर एकच पाण्याची बाटली आणि एकाच ग्लासाद्वारे वर्गात सर्वांना पाणी दिले जात होते.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र