शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

‘आपत्तींसाठी राष्ट्रीय धोरणाची आवश्यकता’

By admin | Updated: August 15, 2016 03:24 IST

देशातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या शहराला चक्रीवादळ, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत असतो.

मुंबई : देशातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या शहराला चक्रीवादळ, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत असतो. त्यामुळे देशाने स्मार्ट शहरे बनविताना अशाप्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनविणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.द एनर्जी अ‍ॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिटयूट (टेरी), वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘स्मार्ट सिटी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बांठिया, सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गिल, टेरीच्या वरिष्ठ संचालक डॉ. अन्नपूर्णा वंचेस्वरन, टेरीचे धार चक्रवर्ती, मुंबई फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशीर जोशी, जीई वॉटर अ‍ॅन्ड प्रोसेस टेक्नॉलॉजीसचे विक्री संचालक आनंद कृष्णमूर्ती, अ‍ॅम्बी व्हॅली लिमिटेडच्या नियोजन आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख हिमांशू पाठक, यूएनडीपीच्या आभा मिश्रा, टेरीच्या रैना सिंग, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिटयूटच्या लुबैना रंगवाला आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मुंबई उपाध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.जयंत बांठिया म्हणाले, चेन्नई आणि गुरगाव येथील पुराची दृश्ये पाहिल्यानंतर आपल्या पुढचे आव्हान किती मोठे आहे, याची कल्पना येते. अशा दुर्घटनांचा आपण सामूहिकरित्या सक्षमपणे सामना करू शकू का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा दुर्घटनांबाबतची जनजागृती आणि त्यावेळी लोकांकडून अपेक्षित असणारा प्रतिसाद या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जी. एस. गिल म्हणाले, स्थानिक अडचणींचा सामना करूनच सागरी किनारपट्टीवरील शहरांना वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. अशाप्रकारचा संकटांना सामोरे जाण्यासाठी भौगौलिक परिस्थितीचा अभ्यास करून ही शहरे तयार होतात. डॉ. अन्नपूर्णा वंचेस्वरन म्हणाल्या, नैसर्गिक दुर्घटनांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आपली शहरे तयार करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. धार चक्रवर्ती म्हणाले, निवास आणि सेवासुविधा या सर्वात मोठया समस्या आहेत. २०३१ पर्यंत देशाच्या लोकसंख्येपैकी ६० टक्के नागरीक हे शहरात वास्तव्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरीकरण ही मोठी समस्या असून तिच्याकडे गांर्भीयाने लक्ष देणे आवश्यक आहे.हिमांशू पाठक यांनी स्मार्ट शहरांमधील पाणीपुरवठा, मल:निस्सारण, कचरा व्यवस्थापनासारख्या गोष्टींकडे लक्ष देवून त्यासाठी नियमावली तयार करणे गरजेचे आहे, असे सुचविले. रैना सिंग यांनी हवामानबदलांना सामोरे जाण्यासाठी शहरी नियोजनाला संस्थात्मक दर्जा देणे आवश्यक असून स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)