शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज- यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 18:56 IST

नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज आहे.

अमरावती : नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. ज्ञान मिळविण्यासाठी सकारात्मक सातत्य व उजळणी आवश्यक आहे. चांगल्या विचाराचा सकारात्मक पाठपुरावा केल्याने नक्की यश मिळते, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. शालेय शिक्षण विभागातर्फे सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित नवव्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री यशोमती ठाकूर बोलत होत्या. राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शरद गोसावी, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रवींद्र रमतकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, रवींद्र आंबेकर, सहसंचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, प्रिया देशमुख, प्राचार्य संजय खेरडे, राजकुमार अवसरे, शेखर पाटील आदी उपस्थित होते.इन्स्पायर्ड अवॉर्ड उपक्रमातून ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अनेक विद्यार्थी नवे संशोधन करून पेटंटही मिळवतात. अशा अभिनव आविष्कारांसाठी उद्योजकांकडून आर्थिक सहकार्य मिळवून देऊ, असे ना. ठाकूर म्हणाल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध अविष्कारांबद्दल कौतुक केले.-----------------अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला! समाजात महिलांवरील अत्याचार, मुलींच्या अंगावर अ‍ॅसिड फेकणे अशा अनेक अस्वस्थ करणाºया घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीत नीतिमूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. ‘अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.  ---------------३४९ प्रतिकृतींचा समावेश राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात ३८४ विज्ञान प्रतिकृतींची निवड प्राथमिक स्तरावर झाली होती. ३७१ प्रतिकृतींची निवड प्रक्रियेतून झाली. त्यापैकी ३४९ प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. त्या  डिजिटल इंडिया, क्लीन इंडिया, मेक इन इंडिया या संकल्पनेवर आधारित आहेत. १० फेब्रुवारीला प्रदर्शनाचा समारोप होईल. प्रदर्शनात मांडलेल्या १० टक्के प्रतिकृतींची निवड राष्ट्रीय पातळीवर केली जाणार आहे.