शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत खदखद

By admin | Updated: November 20, 2014 10:14 IST

राज्यातील भाजपाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच वैचारिक गोंधळ असल्याचे चिंतन बैठकीत दिसून आले.

चोंढी (अलिबाग) : राज्यातील भाजपाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच वैचारिक गोंधळ असल्याचे चिंतन बैठकीत दिसून आले. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही सत्तेची सुत्रे आपल्या हाती असल्याचा आनंद काहीनी व्यक्त केला, तर भाजपाला पाठिंबा देऊन पक्षाने धर्मनिरपेक्ष विचारधारेला सोडचिठ्ठी दिल्याची भावना काहीनी व्यक्त केली.माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, माजी मंत्री जयंत पाटील, माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आपली परखडे मते मांडली. त्यांच्या मते, भाजपा सरकारला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेबाबत जनमानसांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे. त्याचा फटका पक्षाला बसतो. आपल्या पक्षाच्या भूमिकेत स्पष्टता असायला हवी आणि ती तितक्याच जोरकसपणे त्याचवेळी माध्यमांकडे मांडली गेली पाहिजे, असा आग्रहही या नेत्यांनी धरला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या पाठिंब्याबाबत दोन दिवसात केलेली उलटसुलट वक्तव्य आणि पक्षाच्या विचारधारेबाबत नेत्यांनीच व्यक्त केलेली शंका, असे राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या बैठकीत चित्र दिसले. ‘पक्षाची विचारधारा’ या विषयावर विधानसभेचे माजी सभापती दिली वळसे पाटील यांचे भाषण झाले. आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे. पण राज्यात स्थैर्य राहावे यासाठी आपण भाजपाला पाठिंब्याची भूमिका घेतली, असे समर्थन त्यांनी केले. जातीयवादी पक्षांविरुद्ध आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड हे भाजपाला पाठिंबा देण्यावरून अस्वस्थ असल्याची चर्चा बैठकस्थळी होती. पक्षाच्या भूमिकेवरून दलित, मुस्लिम मतदारांच्या मनात संशय निर्माण केला जात आहे. त्यामुळे आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे आणि राहील हे आपण ठासनू सगळ्यांना सांगितले पाहिजे, अशी आग्रही भूमिका आव्हाड यांनी सांडल्याचे समजते. माजी मंत्री जयंत पाटील यांनी कालच्या भाषणात भाजपाला पाठिंबा देण्यावरून नाराजी व्यक्त केली होती, अशी चर्चा आहे. मात्र आपण तसे बोललो नसल्याचा खुलसाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींजवळ केला. (विशेष प्रतिनिधी)