शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत खदखद

By admin | Updated: November 20, 2014 10:14 IST

राज्यातील भाजपाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच वैचारिक गोंधळ असल्याचे चिंतन बैठकीत दिसून आले.

चोंढी (अलिबाग) : राज्यातील भाजपाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच वैचारिक गोंधळ असल्याचे चिंतन बैठकीत दिसून आले. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही सत्तेची सुत्रे आपल्या हाती असल्याचा आनंद काहीनी व्यक्त केला, तर भाजपाला पाठिंबा देऊन पक्षाने धर्मनिरपेक्ष विचारधारेला सोडचिठ्ठी दिल्याची भावना काहीनी व्यक्त केली.माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, माजी मंत्री जयंत पाटील, माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आपली परखडे मते मांडली. त्यांच्या मते, भाजपा सरकारला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेबाबत जनमानसांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे. त्याचा फटका पक्षाला बसतो. आपल्या पक्षाच्या भूमिकेत स्पष्टता असायला हवी आणि ती तितक्याच जोरकसपणे त्याचवेळी माध्यमांकडे मांडली गेली पाहिजे, असा आग्रहही या नेत्यांनी धरला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या पाठिंब्याबाबत दोन दिवसात केलेली उलटसुलट वक्तव्य आणि पक्षाच्या विचारधारेबाबत नेत्यांनीच व्यक्त केलेली शंका, असे राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या बैठकीत चित्र दिसले. ‘पक्षाची विचारधारा’ या विषयावर विधानसभेचे माजी सभापती दिली वळसे पाटील यांचे भाषण झाले. आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे. पण राज्यात स्थैर्य राहावे यासाठी आपण भाजपाला पाठिंब्याची भूमिका घेतली, असे समर्थन त्यांनी केले. जातीयवादी पक्षांविरुद्ध आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड हे भाजपाला पाठिंबा देण्यावरून अस्वस्थ असल्याची चर्चा बैठकस्थळी होती. पक्षाच्या भूमिकेवरून दलित, मुस्लिम मतदारांच्या मनात संशय निर्माण केला जात आहे. त्यामुळे आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे आणि राहील हे आपण ठासनू सगळ्यांना सांगितले पाहिजे, अशी आग्रही भूमिका आव्हाड यांनी सांडल्याचे समजते. माजी मंत्री जयंत पाटील यांनी कालच्या भाषणात भाजपाला पाठिंबा देण्यावरून नाराजी व्यक्त केली होती, अशी चर्चा आहे. मात्र आपण तसे बोललो नसल्याचा खुलसाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींजवळ केला. (विशेष प्रतिनिधी)