शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

“महायुती सरकारने १ रुपया निधी दिला नाही, अजितदादांच्या पीएला १०० फोन केले”: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 13:27 IST

Jitendra Awhad News: घरकामासाठी नको. मतदारसंघातील गरीब लोकांच्या कामासाठी पैसे हवे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad News: निधीसंदर्भात वर्षभरापूर्वी अजित पवार यांना निवेदन दिले होते. अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या पीएला १०० वेळा फोन केला. मात्र, आजपर्यंत त्यांनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही. मला पैसे माझ्या घरकामासाठी नको. मतदारसंघातील गरीब लोकांच्या कामासाठी पैसे हवे. आमदाराला तीन वर्षांत त्याच्या मतदारसंघातील कामासाठी एक रुपयाही देत नाही, ही कुठली पद्धत आहे, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शिंदे सरकारने आजपर्यंत एक रुपयांचा निधी दिलेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना होत जोडून विनंती करतो, माझ्या मतदारसंघातील जनताही महाराष्ट्राचे नागरीक आहेत. एक जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्या विकासासाठी निधी द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर करण्यात आल्याबाबत महायुती सरकावर टीकास्त्र सोडले.

राज्यात कधीही समाजिक दरी निर्माण झालेली नाही

राज्य सरकार दोन वर्ष मराठा आणि ओबीसी समाजाला खेळवत होते. तेव्हा राज्य सरकारला विरोधी पक्ष आठवला नाही. महाराष्ट्राचा आजपर्यंतचा इतिहास आहे, राज्यात कधीही समाजिक दरी निर्माण झालेली नाही. शिंदे सरकारला मराठा आणि ओबीसींना भडकावायचे होते. आता काहीच पर्याय नाही, म्हटल्यावर त्यांना विरोधी पक्ष आठवतो आहे. त्यांनी आता आमच्या नावाने खापर फोडण्याचे काम सुरू केले आहे. सरकारकडे बहुमत आहे, सरकारने त्यांचा निर्णय घ्यावा, असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील राज्यसभा ठिकठिकाणी दौरे करत असून, सभा, बैठका घेत आहेत. तर, दुसरीकडे सगेसोयरेंचा अध्यादेश काढल्यास मुंबई जाम करू, असा इशारा ओबीसी आंदोलकांकडून देण्यात आला आहे. सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीला जाण्यास नकार दिला.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडVidhan Bhavanविधान भवन