शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

“राज्यातील राजकारण सत्ताधाऱ्यांनी गलिच्छ केले, मराठा आंदोलन...”; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 20:16 IST

MP Supriya Sule News: देशातील अनेक राज्यांतून आरक्षणावर चर्चा होत असून, गेल्या दहा वर्षांत केंद्राने काय केले, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

MP Supriya Sule News: सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे. घरे फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा, ५० खोके एकदम ओके. मराठी माणूस स्वाभिमानी आहे, ५० खोके नॉट ओके. त्यांनी ५० खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केले. देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तसेच नीट परीक्षेच्या गोंधळावरूनही हल्लाबोल केला.

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकारने बघितला पाहिजे. हे सरकार उपोषणाला दहा-पंधरा दिवसांपर्यंत का खेचते, असा सवाल करत, मराठा असो, धनगर, लिंगायत, मुस्लिम कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा विषय असू दे, लवकर निर्णय घेतला पाहिजे. त्यांचे दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये ३०० खासदार आहेत. बाकीच्या राज्यांची आरक्षणाची चर्चा होते, महाराष्ट्राची का होत नाही. देशात जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे, ती सगळी बिल मागवा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच दहा वर्षे त्यांनी केंद्रात सत्ता असून काय केले, असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

नीट परीक्षेचा प्रश्न संसदेत मांडणार

एंटरन्स परीक्षेत होणारे घोळ, पेपरफुटीचे प्रकरण सातत्याने सुरु आहे. तलाठ्याच्या परीक्षेपासून डॉक्टरांच्या परीक्षेपर्यंत हेच होत आहे. प्रशासन तोंडावर पडते आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. अधिवेशनही सुरु होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीचे तीस खासदार मिळून याबद्दल आवाज उठवू. संपूर्ण ताकदीने आम्ही NEETचा प्रश्न, महिलांवरचे अत्याचार, शेतकरी यांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

दरम्यान, पुण्यातील पोर्शची जी केस आहे त्यातही आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही. रक्ताचे नमुने बदलण्यात आले. गृहमंत्रालयाचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीर नाही. त्यामुळे लोकांचा गृहमंत्रालयावरचा विश्वास उडत चालला आहे. पोलिसांबद्दल हे म्हणत नाही. पोलिसांवर माझा विश्वास आहे. पण जे सरकारमधले लोक, यंत्रणा ती पूर्णपणे अपयशी झाली आहे हेच दिसते आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस