शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 19:17 IST

NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवले. संबंधित महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यातच विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

शरद पवार यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वाक्याचा आधार घेत मणिपूर हिंसाचार आणि घडलेल्या सदर घटनेबाबत केंद्रातील मोदी सरकारला चांगलेच सुनावले आहे. शरद पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शरद पवारांनी केंद्र सरकारच्या मणिपूर धोरणांवर टीका केली आहे. 

माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ

माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मणिपूरमध्ये महिलांविरोधात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अस्वस्थ वाटत आहे. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाने यावर तातडीने पाऊले उचलून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. 

दरम्यान, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान त्या ठिकाणी जात नाहीत, पण अमेरिकेचा दौरा करतात असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे शरद पवार म्हणाले होते. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून शरद पवार या हिंसाचारावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस