शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

“देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:16 IST

जालन्यात पोलिसांनी काय केले, हे सर्वांसमोर असल्याचे सांगत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Sharad Pawar News: जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने जनप्रक्षोभ उसळलेला आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, राज्यभरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा बेछूट लाठीमार वरून, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका व्यक्त केली जात असताना सत्ताधाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडेबोल सुनावलेत.

जालन्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. २०१४ लाही युतीचे सरकार सत्तेत होते. आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाने अनेक आंदोलने केली. या आंदोलनांवेळी कधीच बळाचा वापर केला नाही. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. लोक जखमी झाले आहेत. त्यांची क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले. 

देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच

जळगाव दौऱ्यावर असलेले शरद पवार मीडियाशी बोलत होते. जालन्यातील घडामोडींवर बोलताना, मला इतके माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथे पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसते. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणे म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणे आहे, या शब्दांत शरद पवारांनी निशाणा साधला. 

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजतही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत. त्यामुळे आरक्षण दिले जावे, अशी मागणी होत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. ५० टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण