शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

“देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:16 IST

जालन्यात पोलिसांनी काय केले, हे सर्वांसमोर असल्याचे सांगत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Sharad Pawar News: जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने जनप्रक्षोभ उसळलेला आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, राज्यभरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा बेछूट लाठीमार वरून, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका व्यक्त केली जात असताना सत्ताधाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडेबोल सुनावलेत.

जालन्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. २०१४ लाही युतीचे सरकार सत्तेत होते. आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाने अनेक आंदोलने केली. या आंदोलनांवेळी कधीच बळाचा वापर केला नाही. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. लोक जखमी झाले आहेत. त्यांची क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले. 

देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच

जळगाव दौऱ्यावर असलेले शरद पवार मीडियाशी बोलत होते. जालन्यातील घडामोडींवर बोलताना, मला इतके माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथे पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसते. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणे म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणे आहे, या शब्दांत शरद पवारांनी निशाणा साधला. 

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजतही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत. त्यामुळे आरक्षण दिले जावे, अशी मागणी होत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. ५० टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण