शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू; राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 05:29 IST

अपक्ष मतांची जुळवाजुळव करणारा एखादा ‘वजनदार’ उमेदवार देऊन भाजपला शह देता येईल का, याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. १० जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर दोघांमध्ये मुख्यत्वे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाल्याचे कळते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुमारे ४५ मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपला दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळेल, हे निश्चित मानले जात आहे. महत्त्वाची असेल ती सहावी जागा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. अशा वेळी सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीची रणनीती काय असावी याबाबत पवार-ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

सहाव्या जागेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा

- अपक्ष मतांची जुळवाजुळव करणारा एखादा ‘वजनदार’ उमेदवार देऊन भाजपला शह देता येईल का, याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

- महाविकास आघाडीतील मुख्यत्वे शिवसेना व राष्ट्रवादीकडील अतिरिक्त मते व महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची मते या आधारावर सहावी जागा जिंकता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल.

- तथापि, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते याबाबत एकत्र बसून अंतिम निर्णय करतील, असे आजच्या भेटीत ठरल्याचे समजते.

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या सभेत भाजप, केंद्र सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवरही ठाकरे-पवार भेटीला महत्त्व आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे