शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

“सुप्रिया सुळेच बारामतीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 21:52 IST

NCP Jayant Patil-Supriya Sule: महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून निवडणूक लढविणार हे ठरवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

NCP Jayant Patil-Supriya Sule: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या तयारीला आता वेग आला आहे. अनेकविध गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. तिकिटवाटपाबाबत अद्याप हालचाली सुरू झाल्या नसल्या तरी यासंदर्भात काही कयास बांधले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांनी बारामतीलोकसभा मतदारसंघाबाबत मोठे विधान केले आहे. सुप्रिया सुळेच बारामतीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे सांगता येणार नाही. माझ्या पक्षाच्या उमेदवाराबाबत सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळेच आगामी लोकसभा निवडणूक बारामतीमधून लढवतील. मात्र, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून निवडणूक लढविणार हे ठरवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. काही मानाच्या तसेच प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत भाष्य केले. 

गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीत गैर काहीच नाही

संसदेचे अधिवेशन असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. छायाचित्र काढतात. पटेल यांनीही काढले असेल. उद्योगपती अदानी यांनी नवी उद्योग सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनाला पवार गेले, यात गैर काही नाही. अदानी यांना नवा प्रकल्प पवार यांना दाखवायचा असेल. भाजप विरोधातील इंडिया आघाडीत पवार महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणी शंका घेण्याची गरज नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, दुष्काळाबाबतची सरकारची घोषणा हवेतच राहिली आहे. सरकारकडून कोणतीही बैठक झालेली नाही. सरकार भूमिका घेत नाही. ते निवडणुकीत गुंतले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना गणेश मंडळांना भेट देण्यासाठी वेळ आहे, मात्र बैठक घेण्यासाठी नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

दरम्यान, भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे बॅनर काही ठिकाणी लागेल. याबाबत बोलताना, लोकशाहीत कोणी कोणाचा फलक लावू शकतो. समर्थक कोणाला कुठेही बसवितात. पक्षाकडे अनेक असे नेते आहेत जे मुख्यमंत्री होण्याच्या ताकदीचे आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागतात, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. 

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेlok sabhaलोकसभाBaramatiबारामती