शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा दबाव झुगारला!

By admin | Updated: June 17, 2014 09:33 IST

तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे करणार आहात, तर माध्यमांकडे जाहीररीत्या बोलण्याची गरज नाही, असे सुनावतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून दिला

मुंबई : तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे करणार आहात, तर माध्यमांकडे जाहीररीत्या बोलण्याची गरज नाही, असे सुनावतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून दिला. दिवसभरात उभयपक्षी झालेल्या कलगीतुऱ्यानंतर रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची भाषा करण्यात आली होती. लोकहिताचे अनेक निर्णय अडले असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांची कैफियत काँग्रेस श्रेष्ठींकडे करण्याचे ठरले होते. तसेच विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली होती. त्याला मुख्यमंत्री चव्हाण यांनी जाहीर प्रत्युत्तर दिले. लोकहिताचे निर्णय मी घेतच आहे आणि लोक मला निश्चितच पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त करीत कामे होत नसल्याची ओरड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सुनावले. विधानसभेसाठीचे जागावाटपाचे धोरण चर्चा करून ठरवू. हा विषय पत्रकारांसमोर मांडून सोडवता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने विविध चर्चा रंगल्या. राष्ट्रवादीचा दबाव झुगारला! खेरवाडी येथील उड्डाणपुलाचे (फ्लायओव्हर) व पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांनी राष्टÑवादीच्या मागणीबाबत विचारणा केली असता ते व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्टÑवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडे पाहत हसत म्हणाले, ‘ज्या वेळी चर्चा करायला बोलावले, त्या वेळी हे पक्षाच्या कामात होते. त्यामुळे बैठक झाली नाही. आता मीडियासमोर चर्चा करून जागावाटप होणार नाही. त्यासाठी एकत्रित बसून योग्य वेळी चर्चा केली जाईल़ काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनीही आज राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. स्वबळावर लढायला गेले तर त्यांचे नुकसान जास्त होईल. निवडणुकीत काँग्रेसची मते त्यांना मिळतात, त्यांची तेवढी मते आम्हाला पडत नाहीत. एकत्रित लढवायचे असेल तर दबावाचे राजकारण करून वातावरण बिघडविणे योग्य नाही, असे त्यांनी सुनावले. दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. तशा जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला आलेच नाहीत. (विशेष प्रतिनिधी)