शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

राष्ट्रवादीचा दबाव झुगारला!

By admin | Updated: June 17, 2014 09:33 IST

तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे करणार आहात, तर माध्यमांकडे जाहीररीत्या बोलण्याची गरज नाही, असे सुनावतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून दिला

मुंबई : तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे करणार आहात, तर माध्यमांकडे जाहीररीत्या बोलण्याची गरज नाही, असे सुनावतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून दिला. दिवसभरात उभयपक्षी झालेल्या कलगीतुऱ्यानंतर रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची भाषा करण्यात आली होती. लोकहिताचे अनेक निर्णय अडले असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांची कैफियत काँग्रेस श्रेष्ठींकडे करण्याचे ठरले होते. तसेच विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली होती. त्याला मुख्यमंत्री चव्हाण यांनी जाहीर प्रत्युत्तर दिले. लोकहिताचे निर्णय मी घेतच आहे आणि लोक मला निश्चितच पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त करीत कामे होत नसल्याची ओरड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सुनावले. विधानसभेसाठीचे जागावाटपाचे धोरण चर्चा करून ठरवू. हा विषय पत्रकारांसमोर मांडून सोडवता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने विविध चर्चा रंगल्या. राष्ट्रवादीचा दबाव झुगारला! खेरवाडी येथील उड्डाणपुलाचे (फ्लायओव्हर) व पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांनी राष्टÑवादीच्या मागणीबाबत विचारणा केली असता ते व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्टÑवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडे पाहत हसत म्हणाले, ‘ज्या वेळी चर्चा करायला बोलावले, त्या वेळी हे पक्षाच्या कामात होते. त्यामुळे बैठक झाली नाही. आता मीडियासमोर चर्चा करून जागावाटप होणार नाही. त्यासाठी एकत्रित बसून योग्य वेळी चर्चा केली जाईल़ काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनीही आज राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. स्वबळावर लढायला गेले तर त्यांचे नुकसान जास्त होईल. निवडणुकीत काँग्रेसची मते त्यांना मिळतात, त्यांची तेवढी मते आम्हाला पडत नाहीत. एकत्रित लढवायचे असेल तर दबावाचे राजकारण करून वातावरण बिघडविणे योग्य नाही, असे त्यांनी सुनावले. दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. तशा जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला आलेच नाहीत. (विशेष प्रतिनिधी)