शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोल्हापूरच्या घटनेवरून शरद पवारांचा गंभीर आरोप; "सत्ताधारी पक्ष या घटनांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:02 IST

राज्य सरकारची जबाबदारी राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची असते असं शरद पवार म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर - कुणीतरी मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला, चुकीचा असेल पण त्यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणे हे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्साहित करतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप लावला आहे. कोल्हापूरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यातून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. त्यावर शरद पवारांनी भाष्य केले. 

शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्य सरकारची जबाबदारी राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची असते. परंतु राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यातून २ समाजात जातीत आणि धर्मात कटुता निर्माण व्हायला लागली तर ते चांगले लक्षण नाही. हे सगळे घडवले जात आहे. औरंगजेबाचा फोटो दाखवला त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचे, आंदोलन करण्याचे काय कारण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत फोटो दाखवला त्याने कुणाला काय पडलंय, ओडिशात आणि काही राज्यात चर्चेवर हल्ला केला जातो. चर्च आणि ख्रिश्चन समाज शांतता प्रिय असतो. एखाद्याची चूक असेल तर पोलीस कारवाई करेल. धार्मिक स्थळावर हल्ला करण्याची गरज नाही. हे जे काही घडतेय ते सहजासहजी एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यामागे विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं. 

कोल्हापूरात काय घडलं?सोशल मीडियातून आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचे व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. याठिकाणी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. तिथे शहरातील दैंनदिन व्यवहार ठप्प होते. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमा होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत होते. दरम्यान या काळात काही परिसरात दगडफेक झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्जचा वापर केला. सध्या कोल्हापूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणात ६ जणांना अटक केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर