शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय; सुप्रिया सुळेंच्या विधानानं हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 20:28 IST

पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त पक्षाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवारांपासून पक्षाचे सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून सुप्रिया सुळे यांनी भाषण केले. परंतु भाषणाला सुरुवात करताना सुप्रिया सुळेंनी जयंत पाटलांकडे बघून जयंत पाटलांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय असं वाटायला लागलं असं विधान केल्यानं सभागृहात हशा पिकला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंतरावांनी मला बोर्ड एग्जामला बसवले, छगन भुजबळांच्या भाषणानंतर आता गंभीर प्रशासकीय भाषण करणे हे खूप अडचणीचे काम असते. अनेक वक्त्यांना ही अडचण येत असेल. आज फार मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे. आता काळच ठरवेल ही जबाबदारी मी पेलू शकेन की नाही. परंतु देशातील आणि राज्यातील ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्ष माझ्यावर टाकेल पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने मी पूर्ण करेन असं त्यांनी सांगितले. 

तसेच पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले पाहिजे. मंत्री राहिलेल्या आमदारांना ५-७ मतदारसंघ द्यावेत, त्यांचा अनुभव त्या मतदारसंघात घ्यावा. पक्षाशी सलग्न आघाडीने कार्यक्रम राबवावे. दौरा आणि संपर्क यात खूप चांगले काम करतो. पण प्रत्येक जिल्ह्यात नेत्याने महिन्यातून एकदा गेले पाहिजे. पुढील वर्षभर राज्य पिंजून काढा. जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा दुसरा पक्षच नाही असं लोकांना वाटायला हवा. आपण भूमिका काय घेतो याबाबत स्पष्टता हवी असंही सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

दरम्यान, धनगरांना आरक्षण देण्याबाबत टीसचा रिपोर्ट सरकारने पब्लिश केला नाही. मी स्वत: धनगर समाजाबाबत संसदेत ५ दिवस बोलणारी मी खासदार आहे. एकच विधेयक आणा, मराठा, धनगर आणि सर्वच आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी धनगरांना आरक्षण देण्यात आमचा विरोध आहे असं भाजपा नेत्याने संसदेत ऑन रेकॉर्ड सांगतिले. राज्यात आरक्षण देऊ म्हणतात आणि दिल्लीत त्यांची भूमिका बदलते असा आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपावर केला. 

देशाला कुणी वाचवले असेल तर...कोविड काळात राजेश टोपे यांनी जे काम केले त्याचे कौतुक देशपातळीवर होतेय. जातीवरून अनेक पक्ष सध्या बोर्ड लावतात. रेमडेशिवीरसाठी किती लोकांनी फोन केले, ते औषध सिपला कंपनी बनवते, त्याचा मालक यूको हमीद आहेत. तुम्हाला पूनावालाने निर्माण केलेली लस चालते. तुम्हाला औषध चालते, पण धर्म आला तर त्यांचा द्वेष तुम्ही करता. रेमडेशिवीर घेताना बनवणाऱ्याची जात विचारली का? पूनावाला हे अल्पसंख्याक आहेत. देशाला कुणी वाचवले असेल तर अल्पसंख्याक असलेले सायरस पुनावाला यांच्या कंपनीने वाचवले असं सांगत सुप्रिया सुळे यांनी हिंदू-मुस्लीम संघर्षावर भाष्य केले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस