शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय; सुप्रिया सुळेंच्या विधानानं हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 20:28 IST

पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त पक्षाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवारांपासून पक्षाचे सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून सुप्रिया सुळे यांनी भाषण केले. परंतु भाषणाला सुरुवात करताना सुप्रिया सुळेंनी जयंत पाटलांकडे बघून जयंत पाटलांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय असं वाटायला लागलं असं विधान केल्यानं सभागृहात हशा पिकला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंतरावांनी मला बोर्ड एग्जामला बसवले, छगन भुजबळांच्या भाषणानंतर आता गंभीर प्रशासकीय भाषण करणे हे खूप अडचणीचे काम असते. अनेक वक्त्यांना ही अडचण येत असेल. आज फार मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे. आता काळच ठरवेल ही जबाबदारी मी पेलू शकेन की नाही. परंतु देशातील आणि राज्यातील ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्ष माझ्यावर टाकेल पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने मी पूर्ण करेन असं त्यांनी सांगितले. 

तसेच पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले पाहिजे. मंत्री राहिलेल्या आमदारांना ५-७ मतदारसंघ द्यावेत, त्यांचा अनुभव त्या मतदारसंघात घ्यावा. पक्षाशी सलग्न आघाडीने कार्यक्रम राबवावे. दौरा आणि संपर्क यात खूप चांगले काम करतो. पण प्रत्येक जिल्ह्यात नेत्याने महिन्यातून एकदा गेले पाहिजे. पुढील वर्षभर राज्य पिंजून काढा. जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा दुसरा पक्षच नाही असं लोकांना वाटायला हवा. आपण भूमिका काय घेतो याबाबत स्पष्टता हवी असंही सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

दरम्यान, धनगरांना आरक्षण देण्याबाबत टीसचा रिपोर्ट सरकारने पब्लिश केला नाही. मी स्वत: धनगर समाजाबाबत संसदेत ५ दिवस बोलणारी मी खासदार आहे. एकच विधेयक आणा, मराठा, धनगर आणि सर्वच आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी धनगरांना आरक्षण देण्यात आमचा विरोध आहे असं भाजपा नेत्याने संसदेत ऑन रेकॉर्ड सांगतिले. राज्यात आरक्षण देऊ म्हणतात आणि दिल्लीत त्यांची भूमिका बदलते असा आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपावर केला. 

देशाला कुणी वाचवले असेल तर...कोविड काळात राजेश टोपे यांनी जे काम केले त्याचे कौतुक देशपातळीवर होतेय. जातीवरून अनेक पक्ष सध्या बोर्ड लावतात. रेमडेशिवीरसाठी किती लोकांनी फोन केले, ते औषध सिपला कंपनी बनवते, त्याचा मालक यूको हमीद आहेत. तुम्हाला पूनावालाने निर्माण केलेली लस चालते. तुम्हाला औषध चालते, पण धर्म आला तर त्यांचा द्वेष तुम्ही करता. रेमडेशिवीर घेताना बनवणाऱ्याची जात विचारली का? पूनावाला हे अल्पसंख्याक आहेत. देशाला कुणी वाचवले असेल तर अल्पसंख्याक असलेले सायरस पुनावाला यांच्या कंपनीने वाचवले असं सांगत सुप्रिया सुळे यांनी हिंदू-मुस्लीम संघर्षावर भाष्य केले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस