शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

अन्याय, असत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढायची; सुप्रिया सुळेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 13:13 IST

जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी बलिदान दिले ते स्वातंत्र्य आम्ही कुणाच्याही दडपशाही खाली जाऊ देणार नाही असा इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

मुंबई- लोकांमध्ये द्वेष वाढवण्याचं काम केलं जातं आहे. महागाई बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल डिझेल दर आणखी वाढणार आहेत. याचा जाहीर निषेध करायला हवा. दडपशाही दिन साजरा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महागाई, बेरोजगारी, मणिपूर, महिला सुरक्षा यासारख्या आव्हानावर आज बोलावं लागत आहे. यासारखं दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आज मोठी जबाबदारी आली आहे असं सांगत खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान जास्त आहे. सामाजिक परिवर्तन शैक्षणिक क्षेत्रात असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलतो त्या शाहू फुले आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत घेऊन पुढे जात आहे. त्याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे. मला आज भाषणं करताना वेदना होतं आहे. मणिपूर प्रश्ननी आज प्रचंड दुखः होतं आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा हीच आमच्या पक्षाची मागणी असणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. हल्ली सगळे व्हॉट्सअप आणि फेसबुक टाईमवरच बोलतात. याचं कारण नागरिकांना विचारलं तर ते म्हणतात सगळे कॉल रेकॉर्ड होतात. आपण देशाच्या विरोधात कुठलेही काम करत नाही. आपण देशासाठी काम करत आहेत त्यामुळे आपण कुणालाही घाबरण्याचं काम नाही. जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी बलिदान दिले ते स्वातंत्र्य आम्ही कुणाच्याही दडपशाही खाली जाऊ देणार नाही असा इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

दरम्यान, दिड वर्ष झाली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकत झाल्या नाहीत. निवडणूका घ्या ही मागणी स्वातंत्र्यदिनानिमित्त करावी लागते हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न कुणी सोडवायचे नगरसेवक, ग्रामपंचायत, सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात त्यावेळी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडतात. मात्र गेल्या दिड वर्षांपासून सध्याच्या राज्य सरकारने निवडणुका घेतलेल्या नाही. या निवडणुका कोणत्या भीतीमुळे घेण्यात आल्या नाही का? असा प्रश्न देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

संभ्रम आम्ही नव्हे तर समोरचे निर्माण करतात

प्रसार माध्यमांमध्ये रोज नवीन नवीन संभ्रम समोर येत आहे आज देखील अशा काही बातम्या आल्या आहे. शरद पवार साहेबांची संगोल्याची सभा आणि त्यानंतर पत्रकार परिषद पाहिली तर सध्या निर्माण झालेला संभ्रम पुर्णपणे दूर होईल. आपल्याला कुणाशी वैयक्तीक लढायचं नाहीं आपली वैचारिक लढाई आहे. संभ्रम आपण निर्माण करत नाही आहे तर समोरच्यांच्या मनात संभ्रम असल्यामुळे ते निर्माण करत आहे. अन्याय आणि असत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढायची आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांविरोधात इंडिया आघाडी पूर्णपणे ताकतीने समोर जाणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार देखील नाही. जेव्हा केव्हा हिमालय अडचणीत आला त्यावेळी मदतीला सह्याद्री मदतीसाठी धावून गेला असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

घराणेशाही भाजपातच आहे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाषण दरम्यान परिवारवर बोलले आहे. प्रत्येक पक्षामध्ये परिवार राहतील व्यक्ती आहेतच मी संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे भाषण ऐकले होते त्यामध्ये ते म्हटले होते की जर एक बोट दुसऱ्याकडे दाखवले तर तीन बोटे आपल्याकडे असतात असे ते म्हटले होते. जर खरच घराणेशाही बदल करणार असतील तर म्हणजे काय? घराणेशाही म्हणजे जे लोक निवडून आले भाजप मध्ये ही असे लोक आहेत. भ्रष्टाचार बाबत जे आरोप झाले नेत्यांवर जे कधी आरोप झाले भाजपने केले आज ते भाजप मध्ये आहेत. मग संभ्रम काय आहे. भाजपमध्ये याबाबत स्पष्टता नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा