शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

“तो मित्र, भाऊ होता… मिस्त्रींच्या निधनानंतर मी सीट बेल्ट लावण्यास सुरूवात केली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 22:46 IST

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना.

रविवारी कार अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं निधन झालं. जेव्हा कारचा अपघात झाला तेव्हा मिस्त्री हे कारमध्ये मागील सीटवर बसले होते, परंतु त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. यानंतर रस्ते सुरक्षेवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकार कारमध्ये मागील बाजूला बसणाऱ्या लोकांसाठीही सीट बेल्ट अनिवार्य करण्याच्या विचारात आहेत. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “सायरस मिस्त्री माझा मित्र, माझा भाऊ होता. आमचं एक प्रेमळ नातं होतं. माझ्या पतीसोबतही त्यांचं उत्तम नातं होतं. आमची मुलंही एकाच शाळेत शिकली आहे. त्यांचं निधन आमच्यासाठी धक्कादायक आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारमध्ये मागील बाजूला बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अनिवार्य करण्याची संकेत दिले आहेत. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी एनडीटीव्ही इंडियाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. “नितीन गडकरींची मी सकाळीच आभार व्यक्त केले. संसदेत आम्ही केवळ भांडत नाही. गडकरी हे चांगल्या सूचना आणतात. देशहितासाठी आम्ही सर्व खासदार एकत्रच उभे असतो. आपण सुरक्षेबाबत बोलतो पण काही करत नाही. मी पण मागे सीट बेल्ट लावत नव्हते. परंतु सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर मी सीट बेल्ट लावण्यास सुरूवात केली. आपण दुकाचीबद्दल तर बोलतच नाही. त्यातही सुरक्षेबाबत विचार करण्याची गरज आहे,” असंही सुळे म्हणाल्या.

“आता मी कोणाशीही बोलेन तर रस्ते सुरक्षेवरच चर्चा करेन. तुम्ही जरी चालत असाल तरी आता अलर्ट राहण्याची गरज आहे. मोटरसायकलवर अनेकदा लोक फोन कानाला लावून ती चालवत असतात. अपघात झाला तर आपण केवळ बदल करायचाय हा विचार करतो. हा जीवनाचा प्रश्न आहे. कृपया दुचाकी चालवताना मोबाईल वापरू नका,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. याबाबत आपल्याला विचार करण्याची गरज आहे. सुरक्षेला आपण भारतीय अधिक प्राधान्य देत नसल्याचंही त्या म्हणाल्या.

“माझ्या निवडणूक क्षेत्रात एका व्हॅनमध्ये १०-२० मुलं बसली होती. मी त्यांना थांबवलं आणि ओरडले. शाळेतही मी तक्रार केली. या गोष्टी आपण गांभीर्यानं घेत नाही. कोणी हेल्मेट घालून सायकल चालवली तरी आपम त्यांना हसतो. आपल्या स्तरावरही आपल्याला जबाबदारी समजून घ्यायला हवी,” असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेCyrus Mistryसायरस मिस्त्री