शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Maharashtra Politics: भाजपचे ‘मिशन बारामती’ आव्हान सुप्रिया सुळेंनी स्विकारले; म्हणाल्या, “मी स्वत:...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 21:06 IST

Maharashtra News: अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल करत बारामतीत विकास झालेलाच नाही, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics:  २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) अनेक पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून, यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीति आखली असून, त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय नेते आणि मंत्री देशभरात दौरे करत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या मिशन बारामतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनबारामती दौऱ्यावर जाणार आहेत. यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) हे आव्हान स्विकारल्याचे सांगितले जात आहे. 

कर्जत जमखेडचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी राम शिंदे यांनी बारामती जिंकणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आम्ही अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल राम शिंदे यांनी केला. त्याचसोबत बारामतीचा विकास झालेलाच नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केलाय. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

मी स्वतः निर्मला सीतारामन यांना बारामतीचा विकास दाखवेन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येत आहेत. सीताराम बारामती आल्यानंतर बारामतीमध्ये अनेक संस्था आहेत, ज्या त्यांनी पाहाव्यात. त्यासाठी माझी ही त्यांना विनंती असेल की, कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहव्यात यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे . जर सीतारामन यांना वेळ असेल तर मी स्वतः फिरून त्यांना बारामती दाखवेन, असे प्रतिआव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. 

दरम्यान, बारामती तालुक्यात अजून चाळीस गाव पिण्याच्या पाण्यापासून दूर आहेत. जलयुक्त शिवारमूळे थोडाफार दिलासा त्या तालुक्यात मिळाला आहे. अधिक क्षेत्र सिंचनाखाली क्षेत्र येणे आवश्यक आहे. रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. यामुळे ते जो विकासाचा दावा करत आहेत तो सपशेल फोल ठरलेला आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेnirmala sitharamanनिर्मला सीतारामनBaramatiबारामती