शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Maharashtra Political Crisis: “नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 17:03 IST

Maharashtra Political Crisis: वीजदरवाढ निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. राज्यात सत्तानाट्य सुरु असताना गॅस, तसेच विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी हे सरकार राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करेल. तसेच येणाऱ्या काळात इंधनावरील करात कपात केली जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिली होती. मात्र, यानंतर वीजदरवाढ, गॅसदर आणि दूग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्यांवर जीएसटी लावण्यात आला आहे. यावरून आता सुप्रिया सुळे नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत निशाणा साधला.

ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे

महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचे लगोलग तिसरे गिफ्ट देऊन टाकले आहे. यापूर्वी गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता वीजदरवाढीचे हे तिसरे गिफ्टदेखील जनतेला देण्यात आले आहे. ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून केली आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ यंदाच्या वर्षात झालेली चौथी आहे. यामुळे सिलिंडरचे दर दिल्लीत १,०५३.०० रुपये, मुंबईत १०५२.५० रुपये आणि चेन्नईत १०६८.५० रुपये एवढे झाले आहेत. ज्या महागाईच्या मुद्द्यावर, गॅस दरवाढ, इंधन दरवाढीवर मोदी सरकार काँग्रेस आघाडीला हरवून २०१४ मध्ये सत्तेत आले त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांनी या गॅस दरवाढीवर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. एलपीजीच्या किंमतीत सारखी वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ आदीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. एनडीएचे ९३ टक्के मतदारांनी आणि विरोधकांच्या ९४ टक्के मतदारांनी सरकारच्या या दरवाढीला विरोध केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSupriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदे