शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

Maharashtra Political Crisis: “नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 17:03 IST

Maharashtra Political Crisis: वीजदरवाढ निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. राज्यात सत्तानाट्य सुरु असताना गॅस, तसेच विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी हे सरकार राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करेल. तसेच येणाऱ्या काळात इंधनावरील करात कपात केली जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिली होती. मात्र, यानंतर वीजदरवाढ, गॅसदर आणि दूग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्यांवर जीएसटी लावण्यात आला आहे. यावरून आता सुप्रिया सुळे नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत निशाणा साधला.

ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे

महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचे लगोलग तिसरे गिफ्ट देऊन टाकले आहे. यापूर्वी गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता वीजदरवाढीचे हे तिसरे गिफ्टदेखील जनतेला देण्यात आले आहे. ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून केली आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ यंदाच्या वर्षात झालेली चौथी आहे. यामुळे सिलिंडरचे दर दिल्लीत १,०५३.०० रुपये, मुंबईत १०५२.५० रुपये आणि चेन्नईत १०६८.५० रुपये एवढे झाले आहेत. ज्या महागाईच्या मुद्द्यावर, गॅस दरवाढ, इंधन दरवाढीवर मोदी सरकार काँग्रेस आघाडीला हरवून २०१४ मध्ये सत्तेत आले त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांनी या गॅस दरवाढीवर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. एलपीजीच्या किंमतीत सारखी वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ आदीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. एनडीएचे ९३ टक्के मतदारांनी आणि विरोधकांच्या ९४ टक्के मतदारांनी सरकारच्या या दरवाढीला विरोध केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSupriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदे