शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल : मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:13 IST

भाजपला  सत्तेचा आजार झाला असून त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे आपला उपचार करून घेतला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

मुंबई : आम्ही सत्तेत पुन्हा येणार, तर राज्यात मध्यवधी निवडणुका लागू शकतात असे दावा सतत भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर यावरूनच राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर याचवेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर सुद्धा टीका केली.

एक मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले की, आम्ही सत्तेत येणार असाच विचार दिवसभर भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात सुरु असतो. रात्रीही त्यांना हेच स्वप्न पडत आहे. भाजपला  सत्तेचा आजार झाला असून त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे आपला उपचार करून घेतला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

तर हे सरकार 5 वर्षे चालणार आहे. तसेच आमची 25 वर्षांसाठी आघाडी असल्याचे आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा, आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. तर मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल, असेही ते यावेळी म्हणाले.