शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसीत सापडलेले १४ कोटी अन् समीर वानखेडे; बोगस नोटांशी फडणवीस कनेक्शन असल्याचा मलिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 11:41 IST

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिलं; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिलं. अंडरवर्ल्डकडून होत असलेल्या वसुलीला त्यांचाच आशीर्वाद होता. अनेक गुन्हेगारांची सरकारी पदांवर वर्णी लावण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केले आहेत. नोटबंदीनंतर वर्षभर राज्यात एकही मोठी कारवाई का झाली नाही, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत होते, या संदर्भातही मलिक यांनी खळबळजनक दावे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. दहशतवाद, काळा पैसा संपवण्यासाठी नोटबंदी करत असल्याचं मोदींनी सांगितलं. नोटबंदीमुळे बोगस नोटा संपतील, असाही दावा होता. यानंतर मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडूत बनावट नोटा पकडल्या गेल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बोगस नोटांचा खेळ राज्यात सुरू होता, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

८ ऑक्टोबर २०१७ बीकेसीमध्ये छापेमारी करून १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. या प्रकरणात मुंबई, पुण्यातून काही जणांना अटक झाली. नवी मुंबईतूनही एकाला ताब्यात घेण्यात आलं. पण १४ कोटी ५६ लाखांचं ८ लाख ८० हजार असल्याचं सांगून प्रकरण दाबलं गेलं. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडे होता, असं मलिक यांनी सांगितलं.

बोगस नोटा अर्थव्यवस्थेत आणण्याचं काम पाकिस्तान, आयएसआयकडून करण्यात येतं. त्याचा थेट संबंध देशाच्या सुरक्षेशी आहे. पण तरीही या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला नाही. नोटा कुठून आल्या याचा तपास पुढे गेला नाही. कारण तत्कालीन सरकारचं संरक्षण या सगळ्याला होतं, असा आरोप मलिक यांनी केला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडेDemonetisationनिश्चलनीकरण