शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बीकेसीत सापडलेले १४ कोटी अन् समीर वानखेडे; बोगस नोटांशी फडणवीस कनेक्शन असल्याचा मलिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 11:41 IST

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिलं; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिलं. अंडरवर्ल्डकडून होत असलेल्या वसुलीला त्यांचाच आशीर्वाद होता. अनेक गुन्हेगारांची सरकारी पदांवर वर्णी लावण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केले आहेत. नोटबंदीनंतर वर्षभर राज्यात एकही मोठी कारवाई का झाली नाही, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत होते, या संदर्भातही मलिक यांनी खळबळजनक दावे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. दहशतवाद, काळा पैसा संपवण्यासाठी नोटबंदी करत असल्याचं मोदींनी सांगितलं. नोटबंदीमुळे बोगस नोटा संपतील, असाही दावा होता. यानंतर मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडूत बनावट नोटा पकडल्या गेल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बोगस नोटांचा खेळ राज्यात सुरू होता, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

८ ऑक्टोबर २०१७ बीकेसीमध्ये छापेमारी करून १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. या प्रकरणात मुंबई, पुण्यातून काही जणांना अटक झाली. नवी मुंबईतूनही एकाला ताब्यात घेण्यात आलं. पण १४ कोटी ५६ लाखांचं ८ लाख ८० हजार असल्याचं सांगून प्रकरण दाबलं गेलं. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडे होता, असं मलिक यांनी सांगितलं.

बोगस नोटा अर्थव्यवस्थेत आणण्याचं काम पाकिस्तान, आयएसआयकडून करण्यात येतं. त्याचा थेट संबंध देशाच्या सुरक्षेशी आहे. पण तरीही या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला नाही. नोटा कुठून आल्या याचा तपास पुढे गेला नाही. कारण तत्कालीन सरकारचं संरक्षण या सगळ्याला होतं, असा आरोप मलिक यांनी केला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडेDemonetisationनिश्चलनीकरण