शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपची पुरती धुळधाण, सर्व दावे खोटे; नवाब मलिकांची टीका

By देवेश फडके | Updated: January 19, 2021 12:38 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपकडून विविध प्रकारचे खोटे दावे करून भ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. 

ठळक मुद्देनवाब मलिक यांची भाजपवर जोरदार टीकाभाजपकडून केले जात असलेले दावे खोटे - नवाब मलिकबेळगावप्रश्नी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक - नवाब मलिक

मुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विरोधक असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) क्रमांक एकवर गेल्याची दवंडी पिटत आहे. मात्र, भाजपकडून करण्यात येत असलेले दावे खोटे आहेत. भाजपची पुरती धुळधाण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने ८० टक्के जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपकडून विविध प्रकारचे खोटे दावे करून भ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. 

औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेल्या वादामुळे काही ठिकाणी आम्ही एकत्र लढू, तर काही ठिकाणी स्वबळावर लढू, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

महाविकास आघाडी सरकार बेळगावप्रश्नी सकारात्मक आहे. बेळगाव, निपाणीसह मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकार पावले उचलत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, कुणी काहीही दावा केला असला, तरी माझ्याकडे आकडेवारी आहे. आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे ६ हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. राज्यातील एकूण बिनविरोध ग्रामपंचायींपैकी भाजपने ५८० ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि अन्य काही ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी असून, त्यातही भाजपला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnawab malikनवाब मलिकBJPभाजपा