शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
4
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
5
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
6
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
7
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
8
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
9
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
11
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
13
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
14
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
15
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
16
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
17
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
18
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
19
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
20
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपची पुरती धुळधाण, सर्व दावे खोटे; नवाब मलिकांची टीका

By देवेश फडके | Updated: January 19, 2021 12:38 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपकडून विविध प्रकारचे खोटे दावे करून भ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. 

ठळक मुद्देनवाब मलिक यांची भाजपवर जोरदार टीकाभाजपकडून केले जात असलेले दावे खोटे - नवाब मलिकबेळगावप्रश्नी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक - नवाब मलिक

मुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विरोधक असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) क्रमांक एकवर गेल्याची दवंडी पिटत आहे. मात्र, भाजपकडून करण्यात येत असलेले दावे खोटे आहेत. भाजपची पुरती धुळधाण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने ८० टक्के जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपकडून विविध प्रकारचे खोटे दावे करून भ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. 

औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेल्या वादामुळे काही ठिकाणी आम्ही एकत्र लढू, तर काही ठिकाणी स्वबळावर लढू, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

महाविकास आघाडी सरकार बेळगावप्रश्नी सकारात्मक आहे. बेळगाव, निपाणीसह मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकार पावले उचलत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, कुणी काहीही दावा केला असला, तरी माझ्याकडे आकडेवारी आहे. आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे ६ हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. राज्यातील एकूण बिनविरोध ग्रामपंचायींपैकी भाजपने ५८० ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि अन्य काही ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी असून, त्यातही भाजपला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnawab malikनवाब मलिकBJPभाजपा