शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशानं महाराजांनी बांधली; तोडक कारवाईवर आव्हाड म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:43 IST

मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

नांदेड - कसंही करून समाजात दुफळी माजवायची हे सरकारकडून होत असेल तर दुर्दैवी आहे. सर्व समाजाला एकत्र ठेवणे ही केंद्र आणि राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. तीच जबाबदारी झुगारून देत असाल तर त्याला काय बोलणार? अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी अफजल खानाच्या कबरीजवळील तोडक कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इतिहास बघताना त्या नजरेने बघा, अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधलीय. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कबर बांधलीय. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं. दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मराठीविरुद्ध मराठा ही लाईन हर हर महादेव सिनेमाची आहे. मराठ्यांचे शौर्य आहे हे कुणी नाकारून चालणार नाही. मराठ्याच्या नेतृत्वात सगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र लढले. मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात. ऐतिहासिक चित्र तुमच्या नजरेत बसलेले असते. त्या प्रतिमा वेड्यावाकड्या दाखवू शकत नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवू शकत नाही असा इशारा आव्हाडांनी दिला. 

चित्रपटांचा लोकांवर प्रभाव पडतोहर हर महादेव सिनेमात बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवली. त्याचे समर्थन करताना काहीजण दिसले. अफजल खानाला कसा मारला हे लहान पोरांनाही माहित्येय. कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलं. हा इतिहास असताना चित्रपटात मांडीवर बसून त्याचा कोथळा बाहेर काढताना दाखवतात. कशाला असं दाखवता? विकृतीकरण करू नका. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत पुरंदरचा तह झाला हा इतिहास आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला हा इतिहास आहे. शिवराज्यात महिलांचा व्यापार होत होता हे दाखवता? नवीन पिढी आहे. इतिहासाचे दाखले फटाफट बाहेर पडतात. जेम्स लेनचं पुस्तक आले त्याला विरोध झाला नसता तर त्यावर काहींनी पीएचडी केली असती. पुरंदरेंना विरोध केला नसता तर लोकांच्या लक्षात आले नसते. आमचा चित्रपटाला विरोध नाही त्यात काय दाखवलाय हे सांगतोय. जो सेवक ज्याच्यावर शिवरायांचा पराकोटीचा विश्वास होता ते शिवरायांशी लढताना दाखवलेत कसं शक्य आहे? तामिळनाडूचं राजकारण चित्रपटावर गेले. चित्रपटातून प्रतिमा निर्माण केली आणि राजकारणात ते प्रभावी ठरले. दाक्षिणात्य नेत्यांना देव मानलं जाते असं आव्हाडांनी म्हटलं. 

द्वेषाने देश तुटेल, भारत जोडो यात्रेचा उद्देश महत्त्वाचामहाविकास आघाडी तुटली नव्हती. काहीजण स्वप्नरंजन करत असतात. त्याला उत्तर देण्याची गरज नसते. वेळोवेळी त्याचे उत्तर मिळते. या देशाची विचारधारा सर्वधर्म समभावाची आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. ही विचारधारा टिकली तर भारत टिकेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. द्वेषाने हा देश तुटेल. माणसं माणसाला जोडली पाहिजे. महात्मा गांधी, नेहरूंनी जात धर्म विसरून स्वातंत्र्यांचा लढा दिला. द्वेषाच्या राजकारणातून बाहेर पडून मूळ भारत होता. तो परत आला पाहिजे. ज्या उद्देशाने भारत जोडो यात्रा निघाली तो महत्त्वाचा आहे. केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये विरोधाभास दिसतोय. केंद्र आणि राज्य संबंध ज्यारितीने ताणले जातायेत ते विकासासाठी चांगले नाही असं सांगत आव्हाड भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड