शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशानं महाराजांनी बांधली; तोडक कारवाईवर आव्हाड म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:43 IST

मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

नांदेड - कसंही करून समाजात दुफळी माजवायची हे सरकारकडून होत असेल तर दुर्दैवी आहे. सर्व समाजाला एकत्र ठेवणे ही केंद्र आणि राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. तीच जबाबदारी झुगारून देत असाल तर त्याला काय बोलणार? अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी अफजल खानाच्या कबरीजवळील तोडक कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इतिहास बघताना त्या नजरेने बघा, अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधलीय. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कबर बांधलीय. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं. दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मराठीविरुद्ध मराठा ही लाईन हर हर महादेव सिनेमाची आहे. मराठ्यांचे शौर्य आहे हे कुणी नाकारून चालणार नाही. मराठ्याच्या नेतृत्वात सगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र लढले. मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात. ऐतिहासिक चित्र तुमच्या नजरेत बसलेले असते. त्या प्रतिमा वेड्यावाकड्या दाखवू शकत नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवू शकत नाही असा इशारा आव्हाडांनी दिला. 

चित्रपटांचा लोकांवर प्रभाव पडतोहर हर महादेव सिनेमात बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवली. त्याचे समर्थन करताना काहीजण दिसले. अफजल खानाला कसा मारला हे लहान पोरांनाही माहित्येय. कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलं. हा इतिहास असताना चित्रपटात मांडीवर बसून त्याचा कोथळा बाहेर काढताना दाखवतात. कशाला असं दाखवता? विकृतीकरण करू नका. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत पुरंदरचा तह झाला हा इतिहास आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला हा इतिहास आहे. शिवराज्यात महिलांचा व्यापार होत होता हे दाखवता? नवीन पिढी आहे. इतिहासाचे दाखले फटाफट बाहेर पडतात. जेम्स लेनचं पुस्तक आले त्याला विरोध झाला नसता तर त्यावर काहींनी पीएचडी केली असती. पुरंदरेंना विरोध केला नसता तर लोकांच्या लक्षात आले नसते. आमचा चित्रपटाला विरोध नाही त्यात काय दाखवलाय हे सांगतोय. जो सेवक ज्याच्यावर शिवरायांचा पराकोटीचा विश्वास होता ते शिवरायांशी लढताना दाखवलेत कसं शक्य आहे? तामिळनाडूचं राजकारण चित्रपटावर गेले. चित्रपटातून प्रतिमा निर्माण केली आणि राजकारणात ते प्रभावी ठरले. दाक्षिणात्य नेत्यांना देव मानलं जाते असं आव्हाडांनी म्हटलं. 

द्वेषाने देश तुटेल, भारत जोडो यात्रेचा उद्देश महत्त्वाचामहाविकास आघाडी तुटली नव्हती. काहीजण स्वप्नरंजन करत असतात. त्याला उत्तर देण्याची गरज नसते. वेळोवेळी त्याचे उत्तर मिळते. या देशाची विचारधारा सर्वधर्म समभावाची आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. ही विचारधारा टिकली तर भारत टिकेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. द्वेषाने हा देश तुटेल. माणसं माणसाला जोडली पाहिजे. महात्मा गांधी, नेहरूंनी जात धर्म विसरून स्वातंत्र्यांचा लढा दिला. द्वेषाच्या राजकारणातून बाहेर पडून मूळ भारत होता. तो परत आला पाहिजे. ज्या उद्देशाने भारत जोडो यात्रा निघाली तो महत्त्वाचा आहे. केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये विरोधाभास दिसतोय. केंद्र आणि राज्य संबंध ज्यारितीने ताणले जातायेत ते विकासासाठी चांगले नाही असं सांगत आव्हाड भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड