शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:40 IST

चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मुंबई - बाबरी पाडल्याच्या घटनेवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी हे विधान टाळायला हवं होते. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे असं सांगत भाजपाने या वादात हात वर केले आहेत. तर दुसरीकडे पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाची पाठराखण केली आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे. बाबरीचं जे आंदोलन झाले. कारसेवक म्हणून अनेकजण तिथे गेले होते. त्यात मीही सहभागी होतो. १५ दिवस मला तुरुंगवास भोगावा लागता. पोलिसांनी मला मारहाणही केली होती. दोन्ही वेळेस त्या आंदोलनात फार कमी प्रमाणात शिवसैनिक होते हे मी स्वत: अनुभवले आहे. शिवसेनेचे मंत्री कोण उपस्थित होते, जे आले तेदेखील उशीरा आले. सुभाष देसाई त्यात होते. सगळे झाल्यावर आले होते. कारसेवक म्हणून आम्ही गेलो, पायी गेलो, ट्रेनने गेलो. पोलिसांचा मार खाल्ला, अत्यंत वाईट वागणूक दिली. तुरुंगवास भोगला, त्यावेळी किती शिवसैनिक होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

तसेच बाबरी ढाचा पडल्यानंतर त्याची जबाबदारी कुणी घ्यावी? तेव्हा भाजपा ती जबाबदारी घेण्यास मागेपुढे पाहत होती. आम्ही पाडलंय हे म्हणण्याचे धैर्य भाजपात नव्हते. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी होय, बाबरी मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं विधान केले. हे आंदोलन खूप वर्ष चालले. शिलापूजन, जलपूजन, गंगाजलपूजन झाले वैगेरे ८५-८६ पासून आम्ही या आंदोलनात सहभागी होतो. यात बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तोपर्यंत शिवसेनेचा सहभाग फार कमी दिसला असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?  बाबरी मशीद पाडण्यात विश्व हिंदू परिषद, कार सेवक, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही असतील; पण बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. 

उद्धव ठाकरेंचा पलटवारचंद्रकांत पाटलांच्या विधानावरून वाद पेटल्यानंतर यावर उद्धव ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली. ठाकरे म्हणाले की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ पाहा. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपाकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलeknath khadseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिर