शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:40 IST

चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मुंबई - बाबरी पाडल्याच्या घटनेवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी हे विधान टाळायला हवं होते. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे असं सांगत भाजपाने या वादात हात वर केले आहेत. तर दुसरीकडे पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाची पाठराखण केली आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे. बाबरीचं जे आंदोलन झाले. कारसेवक म्हणून अनेकजण तिथे गेले होते. त्यात मीही सहभागी होतो. १५ दिवस मला तुरुंगवास भोगावा लागता. पोलिसांनी मला मारहाणही केली होती. दोन्ही वेळेस त्या आंदोलनात फार कमी प्रमाणात शिवसैनिक होते हे मी स्वत: अनुभवले आहे. शिवसेनेचे मंत्री कोण उपस्थित होते, जे आले तेदेखील उशीरा आले. सुभाष देसाई त्यात होते. सगळे झाल्यावर आले होते. कारसेवक म्हणून आम्ही गेलो, पायी गेलो, ट्रेनने गेलो. पोलिसांचा मार खाल्ला, अत्यंत वाईट वागणूक दिली. तुरुंगवास भोगला, त्यावेळी किती शिवसैनिक होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

तसेच बाबरी ढाचा पडल्यानंतर त्याची जबाबदारी कुणी घ्यावी? तेव्हा भाजपा ती जबाबदारी घेण्यास मागेपुढे पाहत होती. आम्ही पाडलंय हे म्हणण्याचे धैर्य भाजपात नव्हते. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी होय, बाबरी मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं विधान केले. हे आंदोलन खूप वर्ष चालले. शिलापूजन, जलपूजन, गंगाजलपूजन झाले वैगेरे ८५-८६ पासून आम्ही या आंदोलनात सहभागी होतो. यात बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तोपर्यंत शिवसेनेचा सहभाग फार कमी दिसला असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?  बाबरी मशीद पाडण्यात विश्व हिंदू परिषद, कार सेवक, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही असतील; पण बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. 

उद्धव ठाकरेंचा पलटवारचंद्रकांत पाटलांच्या विधानावरून वाद पेटल्यानंतर यावर उद्धव ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली. ठाकरे म्हणाले की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ पाहा. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपाकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलeknath khadseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिर