शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Maharashtra Politics: “...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:16 IST

Maharashtra Politics: नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या दिलेल्या राजीनाम्यावरून आता महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने नाना पटोले यांच्या या राजीनाम्यावर भाष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसवर टीका केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हा कुणालाही विश्वासात घेतले नाही. त्यानंतर इतर पेच निर्माण झाले आणि सरकार कोसळले, असे छगन भुजबळ म्हणाले. 

कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होऊ शकला नाही. त्यानंतरच महाविकास आघाडी सरकार कोसळले. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असा दावा छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना केला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले. मी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते असे म्हणता तर तुमचे नेतृत्व कमी पडत होते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचे नेतृत्व कमी पडत होते का? असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? हा प्रश्न निर्माण होतो, असा टोला नाना पटोलेंनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीChhagan Bhujbalछगन भुजबळ