शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 10:43 IST

यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही, बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे.

Maharashtra Politics: परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी कापणीला आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. त्यात दिवाळसण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी () यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाशी संवाद साधला. यावेळी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर अमोल मिटकरींनी टीका केली. 

शेतकऱ्याच्या घरात आनंद नसेल तर तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छ्यांना काय अर्थ आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा आलेला नाही. सोयाबीन परतीच्या पावसाने सगळं संपवून टाकले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे तुम्ही काम करता. हेच का तुमचे हिंदुत्व, अशी विचारणा अमोल मिटकरींनी केली आहे. अब्दुल सत्तार कृषिमंत्री आहेत. थोडीतरी शिल्लक असेल, तर बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे. 

यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे

मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला माणूस आहे. मला असे वाटते की यंदा शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे. यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात कधी झाले नाही, असा दावा अमोल मिटकरींनी केला. तसेच माझी सरकारला विनंती आहे की, हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात यावे. नागपुरात अधिवेशन घेण्यात यावे, असा करार आहे. पण, विदर्भातील शेतकऱ्यांची यंदा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. एका अधिवेशनाचा चारशे-पाचशे कोटी रुपये खर्च येतो. त्याऐवजी तो पैसा कापूस उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी यांना ते पाचशे कोटी रुपये देण्यात यावे. यंदा शेतकरी हवालदील झाला आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या यात्रेला लाखोचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आता अत्यंत अस्वस्थता माजली आहे, असा दावा करत गुणरत्न सदावर्ते यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सदावर्ते हा भाजपची कळसुत्री आहे. भाजप सदावर्तेसारख्या लोकांना पुढे करत आहे. सदावर्तेंना मी व्यक्ती मानत नाही ती एक प्रवृत्ती आहे. असा आरोप अमोल मिटकरींनी यावेळी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस