शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

NCP करणार शिंदे गटाच्या ५ आमदारांचा ‘करेक्ट’कार्यक्रम; जयंत पाटील म्हणाले...

By अमित महाबळ | Updated: August 27, 2022 20:01 IST

जिल्ह्यातले जे पाच फुटले त्यांच्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील पाच आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार असून, त्यांच्या मतदारसंघात ‘५० खोके, एकदम ओके’ घोषणा छापलेले टी-शर्ट मोठ्या संख्येने वितरीत करण्यात येणार आहेत. याच घोषणेमुळे विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांना भिडले होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी, आढावा बैठक जळगाव शहरातील पक्ष कार्यालयात झाली. यावेळी टी-शर्टच्या सूचनेला त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला. पक्षाचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले, की  आज जनतेला विश्वास आहे की, शिंदे सरकार टिकणार नाही. त्यांना राष्ट्रवादीवर भरवसा आहे. ‘५० खोके, एकदम ओके’प्रत्येक घरात आणि झोपडीत गेले आहे. पाच आमदारांच्या मतदारसंघात ही घोषणा छापलेले टी-शर्ट वाटा. उमेदवाराने १० हजार आणि पक्षाने १० हजार टी शर्ट वाटावेत. त्यानंतर बघा, राष्ट्रवादीचा उमेदवार १०० टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

जिल्ह्यातले जे पाच फुटले त्यांच्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात नसतील एवढे नऊ माजी आमदार जिल्ह्यात आहेत. त्यापैकी सात परत निवडून आणण्यासाठी कामाला लागूया, असे आवाहन त्यांनी केले. तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख यापुढे लोकांच्या मनातील असावा, अशी मागणी त्यांनी केली.

अट एकच, टी शर्ट कायम डोळ्यासमोर ठेवा 

प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टी-शर्टच्या सूचनेची तात्काळ दखल घेतली. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ता नाराज आहे. टी-शर्ट वाटा आणि तो कायम लोकांच्या डोळ्यासमोर राहील याची काळजी घेत रहा, अशी सूचना केली.

चार ओरिजनल आणि एक डुप्लिकेट 

आ. अनिल पाटील म्हणाले, की नियोजनपूर्वक काम केल्यास जिल्ह्यातून पक्षाचे सात ते आठ आमदार आणि दोन खासदार निवडून येतील. आता जे चार गेले आहेत. त्यांच्यात एक ॲडिशनल आहे. चार ओरिजनल आणि एक डुप्लिकेट आहे. आपण पाठिंबा दिला नसता तर तो निवडूनही आला नसता. या पाच जणांना घरी पाठवायची मानसिकता जिल्ह्यात आहे. मनपा व जि.प.निवडणुकीत आ. गिरीश महाजांनी दोनशे, पाचशे, सातशे कोटी अशी नुसतीच आकड्यांची फेकाफेकी केली होती. सत्ता येताच त्याचा विसर पडल्याचेही आ. पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे