शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

“३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा”; नाथाभाऊंनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 19:42 IST

Vidhan Parishad Election 2022: बविआकडे तीन मते आहेत. मत मागायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

विरार: आताच्या घडीला राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2022) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असला, तरी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी जाहीर करत भाजपसमोर आव्हान उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी आपला विजय निश्चित करण्यासाठी अनेकांच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नाथाभाऊंनी भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क साधून निवडणुकीत मत देण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे. 

यातच एकनाथ खडसे यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या भेट घेतली. विरारच्या विवा महाविद्यालयात या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी या भेटीविषयी माहिती दिली. दुसरीकडे, बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्याआधी भाजपच्याही अनेक नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांनी भेट घेतली होती. 

३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा

मी उमेदवार आहे. बविआकडे तीन मते आहेत. त्यामुळे मी मत मागायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य तो निर्णय घेतील. मी शब्द घेण्यासाठी आलो नाही, तर मत मागण्यासाठी आलो. उमेदवार म्हणून मते मागणे आपले काम आहे. आमचा ३२ वर्षांपासूनचा संबंध आहे. या भेटीत राजकारणासह कौटुंबिक चर्चाही झाली, अशी माहिती खडसे यांनी दिली. तत्पूर्वी, हितेंद्र ठाकूर स्वत: आमदार आहेत. त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूरदेखील विधानसभेचे सदस्य आहेत. मात्र ते सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी लवकरात लवकर भारतात परतावे आणि आपल्या बाजूने मतदान करावे यासाठी भाजप आणि मविआचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील ठाकूर यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला १२ मते कमी पडतात. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६१ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकeknath khadseएकनाथ खडसेHitendra Thakurहितेंद्र ठाकूर