शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 10:54 IST

Maharashtra Political Crisis: नवे शिंदे-फडणवीस सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.

जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठे भाकित केले आहे. नवे सरकार कोसळू शकते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत सत्ताधाऱ्यापासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना, यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असा दावा केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

एकनाथ खडसेंचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत. हे सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात १६ आमदारांच्या पात्रतेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. त्या १६ आमदारांना एकतर गट स्थापन करून कोणत्यतरी पक्षात जावे लागेल, नाहीतर ते अपात्र ठरू शकतात, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, या प्रकरणी १ तारखेलाच निर्णय होईल, असे ठामपणे सांगता येत नाही. कदाचित सर्वोच्च न्यायालय पुढील तारखाही देऊ शकते. किंवा मग हे प्रकरण घटनापीठाकडेही सोपविले जाऊ शकते. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्यकारभार चालवत आहेत. जो पर्यंत न्यायालयाचा निकाल लागत लागत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत आहे असे दिसते, असे खडसे म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळeknath khadseएकनाथ खडसेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस