शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

छत्रपती शिवरायांबाबत विधान, शरद पवारांनंतर अजितदादांनी योगींना सुनावले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 20:23 IST

Ajit Pawar Reaction On Yogi Adityanath Statement: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे.

Ajit Pawar Reaction On Yogi Adityanath Statement: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानांवरून आता टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावरून काका-पुतण्यात संघर्ष सुरू असला तरी या मुद्द्यावर शरद पवार आणि अजित पवार यांचे एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. 

पावन आळंदी भूमीत येण्याचे भाग्य लाभले. सनातन धर्मासाठी काम करत आलो आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीपुढे नतमस्तक आहे. लहान वयात ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदीत यायची इच्छा होती. ती पूर्ण झाली. महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवले. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथे संतांचे सान्निध्य आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. यावरून अजित पवार यांनी टीका केली. 

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या, त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे, या शब्दांत अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा समचार घेतला. स्वराज्य सप्ताह सुरू आहे. हिंदवी स्वराज्य स्थापना शिवाजी महाराज यांनी केली. रयतेचे राज्य स्थापन केले. समाजातील नवीन पिढीला माहिती होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपला इतिहास त्यांना कळावा हा आमचा हेतू आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वामध्ये राजमाता जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजामाता यांनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. जिजाऊंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्त्व आणि राजमाता जिजाऊंनी केलेले मार्गदर्शन यांमुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारyogi adityanathयोगी आदित्यनाथShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज