शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

छत्रपती शिवरायांबाबत विधान, शरद पवारांनंतर अजितदादांनी योगींना सुनावले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 20:23 IST

Ajit Pawar Reaction On Yogi Adityanath Statement: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे.

Ajit Pawar Reaction On Yogi Adityanath Statement: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानांवरून आता टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावरून काका-पुतण्यात संघर्ष सुरू असला तरी या मुद्द्यावर शरद पवार आणि अजित पवार यांचे एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. 

पावन आळंदी भूमीत येण्याचे भाग्य लाभले. सनातन धर्मासाठी काम करत आलो आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीपुढे नतमस्तक आहे. लहान वयात ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदीत यायची इच्छा होती. ती पूर्ण झाली. महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवले. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथे संतांचे सान्निध्य आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. यावरून अजित पवार यांनी टीका केली. 

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या, त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे, या शब्दांत अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा समचार घेतला. स्वराज्य सप्ताह सुरू आहे. हिंदवी स्वराज्य स्थापना शिवाजी महाराज यांनी केली. रयतेचे राज्य स्थापन केले. समाजातील नवीन पिढीला माहिती होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपला इतिहास त्यांना कळावा हा आमचा हेतू आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वामध्ये राजमाता जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजामाता यांनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. जिजाऊंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्त्व आणि राजमाता जिजाऊंनी केलेले मार्गदर्शन यांमुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारyogi adityanathयोगी आदित्यनाथShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज