शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

'अब की बार 72 घोटाळेबाज फरार'; राष्ट्रवादीची केंद्रसरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 14:43 IST

२०१५ सालानंतर तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे.

मुंबई : विजय माल्ल्या, नीरव मोदी सारखे अनेक उद्योगपती बँकांची फसवणूक करुन देश सोडून फरार झाल्याच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या हे दोनच उद्योगपती देश सोडून गेलेले नाहीत. देशातील तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. यावरून राष्ट्रवादीने केंद्रसरकारवर टीका केली आहे.

मोदी सरकारच्या राजवटीत आर्थिक घोटाळे करुन परदेशात पळून गेलेल्या भारतीय उद्योजकांची यादी पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण, २०१५ सालानंतर तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहुल चोकसी, ललित मोदी यांच्यासारखे तब्बल ७२ उद्योजक मोदी सरकारच्या कृपेमुळे मोठे आर्थिक घोटाळे करुन पळून जाण्यात यशस्वी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

तर, हे आरोपी देशात वास्तव्यास आहेत की नाही याचा तपास सुरु आहे. त्यांचा पत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.