शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

'अब की बार 72 घोटाळेबाज फरार'; राष्ट्रवादीची केंद्रसरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 14:43 IST

२०१५ सालानंतर तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे.

मुंबई : विजय माल्ल्या, नीरव मोदी सारखे अनेक उद्योगपती बँकांची फसवणूक करुन देश सोडून फरार झाल्याच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या हे दोनच उद्योगपती देश सोडून गेलेले नाहीत. देशातील तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. यावरून राष्ट्रवादीने केंद्रसरकारवर टीका केली आहे.

मोदी सरकारच्या राजवटीत आर्थिक घोटाळे करुन परदेशात पळून गेलेल्या भारतीय उद्योजकांची यादी पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण, २०१५ सालानंतर तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहुल चोकसी, ललित मोदी यांच्यासारखे तब्बल ७२ उद्योजक मोदी सरकारच्या कृपेमुळे मोठे आर्थिक घोटाळे करुन पळून जाण्यात यशस्वी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

तर, हे आरोपी देशात वास्तव्यास आहेत की नाही याचा तपास सुरु आहे. त्यांचा पत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.