शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: २०२४ लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात चेहरा कोण? शरद पवार म्हणाले, “काँग्रेसला सोबत घेऊ नये…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:59 IST

Sharad Pawar Maharashtra News: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी अतिशय स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

Maharashtra Politics: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपसह अनेक पक्षांनी आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. भाजपने तर खास रणनीति आखली असून, याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी देशभरातील विविध भागांमध्ये दौरे करत आहेत. मात्र, पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याविरोधात २०२४ मध्ये विरोधकांकडून कोण असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसच्या सहभागावरून सूचक विधान केले.

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातच शरद पवार यांनीही विरोधकांची एकजूट घडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यातच शरद पवार यांना विरोधकांच्या एकजुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवारांनी अतिशय स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

२०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढेल का?

देशभरातील विरोधी पक्ष २०२४ मध्ये एकत्रित लढेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेले नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मते मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचे निर्णयात रुपांतर झालेले नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसला सोबत घेऊ नये असे काहींचे म्हणणे आहे. पण मला वाटते, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये, असे शरद पवार यांनी नमूद केले. 

दरम्यान, नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचे जाही केल्यासंबंधी विचारले असता, आमच्या शुभेच्छा आहेत असे शरद पवार म्हणाले. तसेच कारण नसताना संजय राऊत यांना तुरुंगात टाकले आहे आणि आम्ही वाऱ्यावर सोडले असे बोलत आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना विनाकारण जेलमध्ये टाकले आहे, असा दावा शरद पवारांनी केला. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस