शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

I.N.D.I.A. आघाडीत जागावाटपावरुन मतभेद? शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “वाद होणार...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 16:59 IST

Sharad Pawar On I.N.D.I.A. Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावरून मतभेद असल्याबाबत चर्चा सुरू असून, शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

Sharad Pawar On I.N.D.I.A. Alliance: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आता उमेदवार कोण असतील, याबाबत चाचपणी सुरू आहे. विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली असून, जागावाटपाबाबत निश्चितता आलेली पाहायला मिळत नाही. यातच पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल, याबाबतही एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंडिया आघाडीत जागावाटपावरून मतभेद आहेत का, याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

मीडियाशी बोलताना शरद पवार यांना लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सध्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका येतील तेव्हा काही जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रश्न येतात, तेव्हा त्या राज्यात ज्यांचा रस नाही, अशांना तिथे पाठवून त्या मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मध्य प्रदेश, राजस्थान यासह चार राज्यांमधल्या निवडणुका सध्या महत्त्वाच्या आहेत. तिथे एकवाक्यता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अद्याप ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही. मुंबईत परतल्यानंतर काँग्रेस व इतर पक्षीय नेत्यांशी चर्चा करून यावर वाद होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. हे येत्या ८-१० दिवसांत होईल असा अंदाज आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध समुदायांकडून आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली जाताना पाहायला मिळत आहे. यावर बोलताना, लोकांची आरक्षणाची मागणी आहे. त्यासाठी उपोषण केले गेले. राज्य सरकारने त्यांना मुदत वाढवून दिली आहे. प्रश्न सोडवण्याचा विश्वास दिला आहे. ज्यांना आरक्षण मिळते, त्यांच्यातला वाटा अन्य कुणी घेऊ नये अशी अपेक्षा ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल. दुसऱ्या कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा विश्वासही शिंदे सरकारने दिला आहे. आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेते, हे पुढच्या ३०-३५ दिवसांत दिसेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर काय होईल हे सांगता येत नाही, असे शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी