शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Sharad Pawar: “सातारच्या ‘त्या’ पावसातील सभेचे श्रेय माझ्याकडे नाही”; शरद पवारांनी सांगितली Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 19:10 IST

शरद पवारांची भर पावसातील सभा चांगलीच गाजली. याची एक आठवण सांगत त्यावेळी नेमके काय घडले, ते सांगितले.

Sharad Pawar: मला शाळेचा अभ्यासाचा कंटाळा यायचा. शाळा संपली की बाहेर वेळ घालवायचो. शाळेत शिकत असताना माझ्या आईला वाटत होते की मी शिकत नाही, म्हणून माझ्या भावाकडे मला राहायला पाठवले. त्यानंतर प्रवरानगरला शाळेत प्रवेश घेतला.त्यावेळी  पोर्तुगीज मुक्त गोवा, अशी मागणी केली जात होती. काही लोक महाराष्ट्रातून तिकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला.काहीजण मृत्युमुखी पडले, त्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. आम्ही ज्या शाळेत शिकत होतो, ती शाळा आम्ही बंद पडली. माझ्या राजकारणाची सुरुवात तिथून झाली आणि आज मी अजून राजकारणात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 

बारामती येथील गदिमा सभागृहात विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तारांगण युवा महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांनी पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. राज्यात कुठेही गेले तरी लोक आस्थेने बोलतात, लोकांच्या जीवनात आणि राहणीमान बदल झाले की समाधान मिळते.  पूर्वी पितळीत चहा मिळायचा. परत चहा कपात आणायचे, पण कपाचे कान तुटलेला असायचा. आज त्याच घरातील  सूनेकडून  ट्रे मधून चहा येतो, हे बघितल्यावर समाधान मिळते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

सातारच्या ‘त्या’ पावसातील सभेचे श्रेय माझ्याकडे नाही

शरद पवार यांनी भर पावसात घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. यानंतर राज्यातील राजकीय चक्रे फिरल्याचे बोलले जाते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक प्रचारासाठी साताऱ्यात ही सभा झाली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, साताऱ्याच्या सभेचे श्रेय माझ्याकडे नाही. मी बोलायला उभा राहिलो आणि पाऊस आला. मला वाटले आता सभा संपली. पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले की लोकांना ऐकायचे आहे. मग मी बोलत राहिलो. लोकांनी ऐकले. अन् आमचा उमेदवारही निवडून दिला. त्या सभेचा व्हिडिओ सर्वत्र फिरले. राज्यभरातून त्याचे कौतुक झाले. ती सभा ऐतिहासिक ठरली होती, असे शरद पवार यांनी नमूद केले. 

दरम्यान, क्रिकेट माझे क्षेत्र नव्हते. माझे सासरे क्रिकेटर होते. माझ्या लग्नाला क्रिकेटर हजर होते. त्यानंतर क्रिकेटशी जवळीक निर्माण झाली. गरवारे क्लबचे भांडण होते. ते मिटत नव्हते. म्हणून त्या संघटनेच्या निवडणुकीला मी उभा राहिलो आणि निवडून आलो. मी कधी क्रिकेटमध्ये राजकारण येऊ दिले नाही. ज्या दिवशी भारत देश क्रिकेटमध्ये अव्वल झाला, त्यावेळी मी राजीनामा दिल्याचे पवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती