शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

“केंद्राच्या धरसोड धोरणामुळे अन्य देश आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत”; शरद पवार थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 17:00 IST

Sharad Pawar News: विश्वास गमावत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली प्रतिमा चुकीची झाली आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar News: अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कांद्याचे रोप कुजलेले आहे. त्याचेही नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी आहे. सरकारचे धोरण धरसोड असेल तर त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागते. आज ती अवस्था देशात झाली आहे. त्याची सर्वाधिक किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि सातारच्या काही भागाला हा फटका बसत आहे. जेएनपीटी असेल किंवा अन्य पोर्ट असेल त्या बंदराच्या बाहेर माल येऊन थांबला आहे. काही माल परदेशात पाठवायचा आहे. पण किंमतीच्या धोरणामुळे निर्यात थांबली आहे. धोरण धरसोडीचे आहे. त्यामुळे इतर देश आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, जेव्हा माझ्याकडे शेती खात्याची जबाबदारी होती. श्रीलंकेला निर्यात करायची होती. तेव्हा कांद्याचे ज्यादा उत्पादन झाले होते. कोलंबला गेलो होतो. त्यावेळी राजपक्षे पंतप्रधान होते. आम्ही त्यांना सांगितले की, आमच्याकडचा कांदा घेतला पाहिजे. ते विनम्रपणे म्हणाले, आम्ही घेणार नाही. मी विचारला का घेणार नाही? कांद्याची गरज नाही का? त्यावर ते म्हणाले, भारत सरकार लोकांचा दबाव आल्यावर निर्यात बंदी घालते. त्यामुळे आमच्या देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होतो. आमचे लोक आम्हाला शिव्या घालतात. त्यामुळे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही सतत धोरण बदलता. तुम्ही विश्वासू व्हा, असे ते म्हणाले होते. आपण विश्वास गमावत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली प्रतिमा चुकीची झाली आहे, असा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना किंमत मोजावी लागली  

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन अधिक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यास सांगितले. त्याला प्रोत्साहन द्यायलाही सांगितले. असे असतानाही ७ डिसेंबर रोजी ऊसाचा रस आणि साखरेच्या सीरपवर केंद्राने बंदी घातली. त्यामुळे त्याची किंमत ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना मोजावी लागली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यात नाशिकचा उल्लेख करावा लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरकायला तयार नाही, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर, त्याचे उत्तर मी काय देणार? एक काळ असा होता की, त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला होता. पण ते आम्हाला सोडून गायब झाले. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र