शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल? छगन भुजबळांचे सूचक विधान म्हणाले, “मिठाचे खडे...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 20:31 IST

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळातील घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानानंतर कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी असे काही ऐकले नाही, कार्याध्यक्ष असे काही पद निर्माण होईल का, इथून मुद्दा आहे. आणि निर्माण करणार असतील, तर काय पद्धत असेल, हा दुसरा मुद्दा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अर्धा डझन लोक तरी असे आहे, की ते कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळू शकतात, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल?

जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्र आहे. तोपर्यंत बाकीचे कुणी काहीही बोलले तरी मला असे वाटते की, तिकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आपल्या नेत्यांनी जे ठरवले आहे, त्यानुसार खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्यामुळे मिठाचे खडे टाकू नये, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण राहिलेले आहे. पंधरा वर्ष राज्य करत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसचे सरकार त्यांच्या काळात गेले. मला असे वाटते की, या सगळ्यांनी आपल्या अंतर्मनात शोध घेतला पाहिजे की, हे असे कसे झाले? तीन वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यानंतर थोडे घर्षण होते. नेत्यांनी जर असे काही म्हटले, तर एकजुटीत विस्कळीतपणा निर्माण होईल. ते होता कामा नये, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMahavikas Aghadiमहाविकास आघाडी