शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

एरंडोलमध्ये पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 14:42 IST

जळगाव जिल्ह्यात युती भक्कम मानली जाते, १९९९ ते २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला जेमतेम दीड-दोन महिन्यांचा कालवधी उरला असताना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाएरंडोल एकमेव मतदारसंघात विजय मिळवता आला होता.  जळगाव जिल्ह्यातील भाजपची आणि शिवसेनेची  ताकद वाढत आहे. त्यामुळे  एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपली ताकद वाढवली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील संख्याबळ ५ वरून १ वर आले होते. एकमेव एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.

एरंडोल मतदारसंघात १९६२ नंतर काँग्रेसला ५ वेळा तर शिवसेनेला ४ वेळा विजया मिळवता आला आहे. इतर २ तर राष्ट्रवादीला २०१४ मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी विजय मिळवता आला होता. त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यात मुख्य लढत झाली होती. तर आमदार सतीश पाटील अवघे १ हजार ९८३ मतांनी निवडून आले होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये  भाजप- शिवसेना वेगवेगळे लढले होते.

जळगाव जिल्ह्यात युती भक्कम मानली जाते, १९९९ ते २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. २०१४ मध्ये सुद्धा सेनेचे उमदेवार चिमणराव पाटील यांना अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.  मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये झालेली गटबाजी आणि युतीची वाढती ताकद यामुळे, एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.