शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

एरंडोलमध्ये पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 14:42 IST

जळगाव जिल्ह्यात युती भक्कम मानली जाते, १९९९ ते २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला जेमतेम दीड-दोन महिन्यांचा कालवधी उरला असताना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाएरंडोल एकमेव मतदारसंघात विजय मिळवता आला होता.  जळगाव जिल्ह्यातील भाजपची आणि शिवसेनेची  ताकद वाढत आहे. त्यामुळे  एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपली ताकद वाढवली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील संख्याबळ ५ वरून १ वर आले होते. एकमेव एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.

एरंडोल मतदारसंघात १९६२ नंतर काँग्रेसला ५ वेळा तर शिवसेनेला ४ वेळा विजया मिळवता आला आहे. इतर २ तर राष्ट्रवादीला २०१४ मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी विजय मिळवता आला होता. त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यात मुख्य लढत झाली होती. तर आमदार सतीश पाटील अवघे १ हजार ९८३ मतांनी निवडून आले होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये  भाजप- शिवसेना वेगवेगळे लढले होते.

जळगाव जिल्ह्यात युती भक्कम मानली जाते, १९९९ ते २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. २०१४ मध्ये सुद्धा सेनेचे उमदेवार चिमणराव पाटील यांना अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.  मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये झालेली गटबाजी आणि युतीची वाढती ताकद यामुळे, एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.