शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 13:23 IST

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मुद्द्यांवरून विरोधी बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार गरिबांसाठी असून, सर्वसामान्यांना न्याय देणार असल्याचा विश्वास दिला जात आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.  ‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलेच झोंबलेले दिसतेय, असा खोचक टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे. 

सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचे सुरुवातीचे दोन दिवस विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून आंदोलन करत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेतही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधारी सदस्यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. यावरूच अमोल मिटकरी यांनी सरकावर टीका केली आहे. 

‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय

अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे  चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला आहे. तत्पूर्वी, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, शिंदे गटाच्या बंडाचे केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणा दिल्या. गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. 

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केलेल्या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन निघाला. ५० खोके एकदम ओके!, रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!, सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. आले रे आले गद्दार आले, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस