शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

नक्षलींची भीती झुगारून ते आले सैन्यभरतीला..!

By admin | Updated: January 10, 2017 20:00 IST

‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा

- अविनाश साबापुरे/ ऑनलाइन लोकमत
 
यवतमाळ, दि. 10 - ‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा हा स्वर आहे. भारत सरकारचा कायम विरोध करीत जेथे नक्षल्यांचे समांतर सरकार प्रबळ आहे, त्याच गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनी भारताच्या रक्षणासाठी सैनिक होण्याचा निर्धार केला आहे. नक्षल्यांची जरब झुगारून आलेल्या या तरुणांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना देश आणि समाजाबद्दल उत्कट प्रेम व्यक्त केले. 
यवतमाळात सुरू असलेल्या विदर्भस्तरीय सैन्यभरतीत वैभव वासेकर, आकाश वासेकर, गणेश कुनघाडकर हे तरुण शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले. आता त्यांना लेखी परीक्षेसाठी पुण्याला जावे लागणार आहे. तत्पूर्वी गावाकडे (कुनघाडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) जायचे आहे. पण यापूर्वीचे काही अनुभव पाहता ते क्षणभर विचारात पडले... ते म्हणाले, गेलो तर काय होईल सांगता येत नाही. आमचे गाव सध्या तरी धोक्यापासून दूर आहे. पण कमळापूर, भामरागड असे घनदाट जंगलांचे परिसर नक्षल्यांनी पूर्णपणे व्यापलेले आहे. तेथील तरुणांना तर सैन्यभरतीची माहितीही नसावी, इतके ते दुर्लक्षित आहे. त्यामुळेच सैन्यभरतीत गडचिरोलीतून सर्वात कमी मुलं येतात. आमच्या जिल्ह्यातले जे लोक अशा भरतीसाठी येतात, ते परत गावाकडे येत नाही. आले तर वाचत नाही. एकदा इन्टीमेशन दिली जाते. ऐकले नाही तर सरळ शूट केले जाते...! 
सर्वसामान्यांसारखेच दिसणारे नक्षली कधी घात करतील, याचा नेम नसल्याने गडचिरोलीतील तरुण ‘नॉर्मल’ जगणे जाणीवपूर्वक टाळतात. एखादी व्यक्ती चारचौघांपेक्षा वेगळी दिसली रे दिसली, की लगेच नक्षल्यांच्या निशाण्यावर येते. त्यामुळेच कारवाफा (ता. धानोरा) येथून आलेला हर्षद बावणे हा तरुण ‘नाव छापू नका’ अशी अट घालूनच बोलायला तयार झाला. अवघ्या दीड एकर शेतीत आईवडील, दोन बेरोजगार भाऊ राबतात. हर्षदही बारावी शिकून शेतीतच राबतो. त्यामुळे जिवाची भीती असली तरी तो सैन्यभरतीकरिता जिल्ह्याच्या बाहेर पडला. 
गडचिरोलीसह भंडारा-गोंदियाच्या ब-याचशा भागात नक्षली कारवायांचे गडद सावट आहे. मात्र, या भीतीसोबतच गरिबी आणि बेरोजगारी हे दोन मोठे शत्रू ठरत आहे. अभावग्रस्त जगण्यातूनच देशासाठी जगण्या-मरण्याची आण घेण्यापर्यंत येथील तरुणांची मजल गेली आहे. पवनीचा (जि. भंडारा) सोनू कोरे शेतमजुरी करत बी.कॉम. फायनलपर्यंत शिकत आला. ‘इतरत्र नोकरी शोधायची तर डोनेशन देऊन गुलामी करावीच लागणार आहे. मग देशाच्या सीमेवर नोकरी करीत मेलो तर काय हरकत आहे?’ हा प्रश्न स्वत:ला विचारत तो सैन्यभरतीत सामील झाला. महिनाभर धान मळणीयंत्रावर मजुरी करून त्याने ५ हजार कमावले अन् तेच घेऊन तो भरतीसाठी यवतमाळात आला. आईवडील वृद्ध असूनही मजुरी करतात ही सल त्याच्या मनात असली तरी समाजासाठी आपले कर्तव्य ओळखून त्याने दोनवेळा रक्तदानही केले. गोंदियाच्या एमआयटी कॉलेजमध्ये बीई करीत असलेला पियूष बनसोडही सैनिक होण्यासाठी आलाय. येथे ‘डोनेशन’ द्यावे लागत नाही, हेच त्याच्या येण्याचे एकमेव कारण. त्याचेच मित्र विवेक सडमथे, साजीद पठाण, सतीश मस्के, अक्षय चौधरी, महेंद्र कारेमोरे, क्षितीज तागडे हे तरुणही याच कारणाने आले आहेत. 
 
पहले देश, बाद मे पेट : शादाब पठाण 
‘आजकल कुछ लोग मुसलमान बोले तो पाकिस्तान का आदमी मानते हैं. लेकीन मेरे को पाकिस्तान से कोई लेना देना नही. जो हम को पाल रहा हैं वो भारतही मेरा सबकुछ हैं.’ हे वाक्य आहे सैन्यभरतीसाठी आलेल्या गोंदियाच्या शादाब पठाणचे. बीए करता-करता तू सैन्यभरतीसाठी का आला, या प्रश्नावर शादाब म्हणाला, ‘देश को अपुन सबकुछ मानता हूं. पिताजीका चिकन सेंटर हैं. वो धंदे मे भी पेट भर सकता हैं. लेकीन मेरलिए पहले देश हैं, उसके बाद मे पेट.’ काटोलच्या ‘टँगो चार्ली करिअर अकॅडमी’च्या ग्रूपने यवतमाळातील सैन्यभरतीत मोफत जेवणाची सोय केली आहे. त्यांच्याच सोबत राहून शादाबही इतर तरुणांना जेवण वाढून देत आहे.