शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नक्षलींची भीती झुगारून ते आले सैन्यभरतीला..!

By admin | Updated: January 10, 2017 20:00 IST

‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा

- अविनाश साबापुरे/ ऑनलाइन लोकमत
 
यवतमाळ, दि. 10 - ‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा हा स्वर आहे. भारत सरकारचा कायम विरोध करीत जेथे नक्षल्यांचे समांतर सरकार प्रबळ आहे, त्याच गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनी भारताच्या रक्षणासाठी सैनिक होण्याचा निर्धार केला आहे. नक्षल्यांची जरब झुगारून आलेल्या या तरुणांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना देश आणि समाजाबद्दल उत्कट प्रेम व्यक्त केले. 
यवतमाळात सुरू असलेल्या विदर्भस्तरीय सैन्यभरतीत वैभव वासेकर, आकाश वासेकर, गणेश कुनघाडकर हे तरुण शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले. आता त्यांना लेखी परीक्षेसाठी पुण्याला जावे लागणार आहे. तत्पूर्वी गावाकडे (कुनघाडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) जायचे आहे. पण यापूर्वीचे काही अनुभव पाहता ते क्षणभर विचारात पडले... ते म्हणाले, गेलो तर काय होईल सांगता येत नाही. आमचे गाव सध्या तरी धोक्यापासून दूर आहे. पण कमळापूर, भामरागड असे घनदाट जंगलांचे परिसर नक्षल्यांनी पूर्णपणे व्यापलेले आहे. तेथील तरुणांना तर सैन्यभरतीची माहितीही नसावी, इतके ते दुर्लक्षित आहे. त्यामुळेच सैन्यभरतीत गडचिरोलीतून सर्वात कमी मुलं येतात. आमच्या जिल्ह्यातले जे लोक अशा भरतीसाठी येतात, ते परत गावाकडे येत नाही. आले तर वाचत नाही. एकदा इन्टीमेशन दिली जाते. ऐकले नाही तर सरळ शूट केले जाते...! 
सर्वसामान्यांसारखेच दिसणारे नक्षली कधी घात करतील, याचा नेम नसल्याने गडचिरोलीतील तरुण ‘नॉर्मल’ जगणे जाणीवपूर्वक टाळतात. एखादी व्यक्ती चारचौघांपेक्षा वेगळी दिसली रे दिसली, की लगेच नक्षल्यांच्या निशाण्यावर येते. त्यामुळेच कारवाफा (ता. धानोरा) येथून आलेला हर्षद बावणे हा तरुण ‘नाव छापू नका’ अशी अट घालूनच बोलायला तयार झाला. अवघ्या दीड एकर शेतीत आईवडील, दोन बेरोजगार भाऊ राबतात. हर्षदही बारावी शिकून शेतीतच राबतो. त्यामुळे जिवाची भीती असली तरी तो सैन्यभरतीकरिता जिल्ह्याच्या बाहेर पडला. 
गडचिरोलीसह भंडारा-गोंदियाच्या ब-याचशा भागात नक्षली कारवायांचे गडद सावट आहे. मात्र, या भीतीसोबतच गरिबी आणि बेरोजगारी हे दोन मोठे शत्रू ठरत आहे. अभावग्रस्त जगण्यातूनच देशासाठी जगण्या-मरण्याची आण घेण्यापर्यंत येथील तरुणांची मजल गेली आहे. पवनीचा (जि. भंडारा) सोनू कोरे शेतमजुरी करत बी.कॉम. फायनलपर्यंत शिकत आला. ‘इतरत्र नोकरी शोधायची तर डोनेशन देऊन गुलामी करावीच लागणार आहे. मग देशाच्या सीमेवर नोकरी करीत मेलो तर काय हरकत आहे?’ हा प्रश्न स्वत:ला विचारत तो सैन्यभरतीत सामील झाला. महिनाभर धान मळणीयंत्रावर मजुरी करून त्याने ५ हजार कमावले अन् तेच घेऊन तो भरतीसाठी यवतमाळात आला. आईवडील वृद्ध असूनही मजुरी करतात ही सल त्याच्या मनात असली तरी समाजासाठी आपले कर्तव्य ओळखून त्याने दोनवेळा रक्तदानही केले. गोंदियाच्या एमआयटी कॉलेजमध्ये बीई करीत असलेला पियूष बनसोडही सैनिक होण्यासाठी आलाय. येथे ‘डोनेशन’ द्यावे लागत नाही, हेच त्याच्या येण्याचे एकमेव कारण. त्याचेच मित्र विवेक सडमथे, साजीद पठाण, सतीश मस्के, अक्षय चौधरी, महेंद्र कारेमोरे, क्षितीज तागडे हे तरुणही याच कारणाने आले आहेत. 
 
पहले देश, बाद मे पेट : शादाब पठाण 
‘आजकल कुछ लोग मुसलमान बोले तो पाकिस्तान का आदमी मानते हैं. लेकीन मेरे को पाकिस्तान से कोई लेना देना नही. जो हम को पाल रहा हैं वो भारतही मेरा सबकुछ हैं.’ हे वाक्य आहे सैन्यभरतीसाठी आलेल्या गोंदियाच्या शादाब पठाणचे. बीए करता-करता तू सैन्यभरतीसाठी का आला, या प्रश्नावर शादाब म्हणाला, ‘देश को अपुन सबकुछ मानता हूं. पिताजीका चिकन सेंटर हैं. वो धंदे मे भी पेट भर सकता हैं. लेकीन मेरलिए पहले देश हैं, उसके बाद मे पेट.’ काटोलच्या ‘टँगो चार्ली करिअर अकॅडमी’च्या ग्रूपने यवतमाळातील सैन्यभरतीत मोफत जेवणाची सोय केली आहे. त्यांच्याच सोबत राहून शादाबही इतर तरुणांना जेवण वाढून देत आहे.