शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात जवान शहीद

By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST

नक्षलविरोधी शोधमोहीम राबविताना पोलीस व नक्षलवाद्यांत उडालेल्या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे हा जवान शहीद झाला.

गडचिरोली : नक्षलविरोधी शोधमोहीम राबविताना पोलीस व नक्षलवाद्यांत उडालेल्या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे हा जवान शहीद झाला. तर या घटनेत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा गडचिरोली पोलिसांनी केला आहे. ही घटना कोरची तालुक्यातील कटेझरी-देवसूर मार्गावर जंगल परिसरात घडली़ ठार झालेल्या नक्षलींचे मृतदेह त्यांच्या साथीदारांनी जंगलात ओढून नेल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. 
धानोरा तालुका मुख्यालयापासून 4क् किमी अंतरावर छत्तीसगड सीमेला लागून गॅरापत्ती पोलीस मदत केंद्र आहे. या केंद्रातील सी-6क् पथकाचे जवान 15 दिवसांपासून कटेझरी - देवसूर जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबवित होते. गुरुवारी रात्री नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे (28) हा पोलीस जवान शहीद झाला. घटनेनंतर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. यात एक भरमार, एक वॉकीटॉकी व दोन पिट्ट असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 
शुक्रवारी सकाळी शहीद जवानाचे पार्थिव हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. गडचिरोलीत पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर दुपारी 1 वाजता शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्याचे पार्थिव विशेष हेलिकॉप्टरने उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच्या गावी पाठविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
 
नक्षलवाद्यांशी चर्चा करणार नाही. त्यांच्याकडून झालेल्या हल्ल्यास जशास जसे प्रत्युत्तर दिले जाईल, त्यासाठी राज्यांमध्ये कमांडो दलाची स्थापना करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.