शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

नवाब मलिक यांच्या जावयाला पुरावे नसल्याने जामीन मंजूर, विशेष न्यायालयाच्या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:24 IST

Court News:

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत विशेष एनडीपीएस न्यायालयाने समीर  खान व अन्य दोघांची गेल्याच महिन्यात जामिनावर सुटका केली. दरम्यान, विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. समीर खान यांना १३ जानेवारी रोजी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) अटक केली. खान हे ड्रग्ज विक्रीत सहभागी आहेत व ते ड्रग्जचे सेवनही करत असल्याचा  आरोप एनसीबीने केला आहे. रासायनिक पृथक्करण अहवालानुसार, पोलिसांनी जप्त केलेल्या ११ नमुन्यांत गांजाचे प्रमाण आढळले नाही. तसेच खान हे कटात सहभागी असल्याचे सिद्ध करणार पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

जावयाकडे गांजा नाही, हर्बल तंबाखू सापडला - मलिक- ‘माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. हर्बल तंबाखू सापडल्याचे न्यायालयाच्या आदेशात दिसतेय. एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखूतील फरक कळत नाही का?’ असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.- मलिक म्हणाले की, या प्रकरणात माझे जावई समीर खान यांना गोवण्यात आले. त्याविरुद्ध ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. विशिष्ट बातम्या पसरवून काही लोकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पतीच्या अटकेचा माझ्या मुलीवर आणि नातवावर विपरित परिणाम झाला. - माझे जावई ड्रग डीलर असल्याचे आरोप भाजपवाले आजही करीत असल्याने मला आज बोलावे लागत आहे. माझा जावई आणि अन्य दोघांना एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने साडेआठ महिन्यांनंतर तुरुंगातून सोडले. न्यायाधीशांच्या आदेशात कुठेही समीर खानकडे गांजा सापडल्याचा उल्लेख नाही, असा दावाही मलिक यांनी केला.

भाष्य करणे चुकीचेनवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर त्यांची बहुतेक जनमानसात बदनामी झाली असावी, त्याची त्यांना मळमळ असावी. त्यामुळेच ते दर दिवशी केवळ सूडभावनेने तपास यंत्रणाविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे.- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद. 

मलिक यांना वाय दर्जाची सुरक्षागेल्या काही दिवसांपासून भाजप व एनसीबीवर कडाडून टीका करणारे मलिक यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आपल्याला सातत्याने धमक्या येत असल्याने राज्य सरकारने सुरक्षा वाढविली असल्याचे मलिक यांनी सांगितले. मलिक यांच्या ताफ्यात आता पायलट कारसह चार रिव्हाॅल्व्हरधारी रक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी पिस्तूलसह एक पोलीस गार्ड सोबत होता. 

एनसीबीचा सावध पवित्रामलिक यांच्या आरोपांवर एनसीबीने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या आरोपानंतर त्याबाबत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी, या प्रकरणात आम्ही वरच्या न्यायालयात अपील केले आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबाबत काहीही बोलू शकत नाही, इतके सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Courtन्यायालयnawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो