शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: 'जावयावरील कारवाईमुळे वानखेडेंवर आरोप करत आहात?' नवाब मलिक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:44 IST

'मी कधीच शाहरुख खानला भेटलो नाही, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हे केलं नाही.'

मुंबई: क्रुज ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer wankhede) यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. पण, यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. मलिकांनी वानखेडेंवर बनावट कागदपत्र सादर करणे, लग्नासाठी धर्म बदलणे अशाप्रकारचे आरोप केले. यानंतर वानखेडे यांच्याकडून त्यांना स्पष्टीकरणही देण्यात आलं. या सर्व प्रकरणावर आज नवाब मलिक यांनी लोकमतशी सविस्तर चर्चा केली. यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

माझ्या जावयाकडे हर्बल तंबाखू होती...लोकमतशी बोलताना मलिकांना विचारण्यात आलं की, तुमच्या जावयावर कारवाई करुन तुरुंगात टाकलं म्हणून तुम्ही सुडबुद्धीने हे करताय? त्यावर नवाब मलिक म्हणाले, 'जावयावरील कारवाईमुळे सुड बुद्धीने मी हे करत नाहीये. मुळात माझ्या जावयाविरोधात रचलेल हे कटकारस्थान होतं. माझ्या जावयाने कधीच गांजाचा व्यवसाय केला नाही. जावयाच्या एका मित्राने हर्बल तंबाखुचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने माझ्या जावयालाही त्या बिझनेसमध्ये येण्यास सांगितलं.' 

'काही दिवसानंतर एनसीबीने जावयाला समन्स पाठवल्याच्या बातम्या माध्यमांवर पाहिल्या. हे समन पाठवल्यानंतर सर्व मीडिया माझ्या मागे लागला. याच्या काही दिवसानंतर जावयाला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे दोनशे किली गांजा असल्याच्या बातम्या समोर आल्या. पण, मुळात तो गांजा नव्हताच, ती हर्बल तंभाखू होती. जावयाला अटक झाल्यानंतर त्या तंबाखूचे नमुने प्रयोगशाळे पाठवले, त्यात हा गांजा नसल्याचे समोर आले', अशी माहिती मलिकांनी दिली. 

एनसीबीच्या बोगस प्रकरणांची माहिती मिळालीयानंतर मलिक म्हणाले की, काहीजण म्हणत आहे की, माझ्या सावयावर कारवाई केली म्हणून मी सुडाचं राजकारण करत आहे. पण, तसच नाहीये. मी त्या शाहरुख खानला(Shahrukh Khan) कधीच भेटलो नाही, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हे करत नाहीये. समीर वानखेडेने माझ्या जावयावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, तेव्हापासूनच मी एनसीबीच्या बोगस प्रकरणांबाबत माहिती घेत होतो. यातच हे आर्यन खानचे प्रकरण समोर आले, यालाही चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले. फक्त आर्यन आणि माझा जावईच नाही, तर अनेक लोकांना अशा बोगस प्रकरणांमध्ये अडकवण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर मी वानखेडेविरोधात बोलणे सुरू केले, असंही ते म्हणाले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेAryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो