शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 00:34 IST

"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे."

मुंबई - महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील हल्ले अद्यापही सुरूच आहे. मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप करत आहेत. नवाब मलिक म्हणाले, मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे. मी विभागा (NCB) विरोधात नाही, तर जे चुकीचे काम करत आहेत त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. लोकप्रियतेसाठी चित्रपटांत काम करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे, असा दावाही मलिक यांनी केला आहे. 

कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही पण..."कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही. पण, जे ड्रग्स घेतात, त्यांची शंका असेल तर त्यांचे रक्त, लघवीचे नमुने घ्या. चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास कोर्टात उभे करा. अशा लोकांना जामीन मिळतो. त्यात एक वर्षाची शिक्षा आहे. त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. वानखेडे यांना विभागात आणले गेले तेव्हा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण होते. त्यावरून बरेच राजकारण झाले. त्यावेळी दीपिका पदुकोण, सारा अली खान यांना लक्ष्य करण्यात आले. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी," असेही मलिक म्हणाले. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांवरही आरोप -नवाब मलिक म्हणाले, नीरज गुंडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच येथे अधिकारी आणले जातात. हे मी जबाबदारीने बोलत आहे. नीरज गुंडे सर्व कार्यालयांत बसलेला असतो.

जावयाच्या अटकेसंदर्भात काय म्हणाले मलिक -ड्रग्ज प्रकरणात आपल्या जावयाच्या अटकेसंदर्भात बोलताना नवाब मलिक म्हणाले, ते जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा साडे आठ महिने आम्ही काहीही बोललो नाही. जेव्हा फॉरेन्सिक अहवाल आला, तेव्हा त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्स नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर, त्यांना जामीन मिळाला. मात्र, जेव्हा मी यावर बोलायला सुरुवात केली, तेव्हा काही पत्रकारांनी सांगितले, की समीर वानखेडे तुमच्यावर नाराज आहे. मला त्यांच्याबद्दल सर्व काही माहित आहे, असेही मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले, वसुली केलेल्या पैशांतून समीर वानखेडे महागडे कपडे परिधान करतात. त्यांचे उत्पन्न किती आहे? एक अधिकारी दररोज दोन लाख रुपयांचे बूट कसे घालतो आणि 75 हजारांचा शर्ट कसा घालू शकतो. आम्ही एका दिवसात कोणतीही माहिती गोळा केलेली नाही. त्यांनी डीआरआय आणि कस्टममध्ये काम केले आहे. ते भ्रष्ट आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडे