शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 00:34 IST

"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे."

मुंबई - महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील हल्ले अद्यापही सुरूच आहे. मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप करत आहेत. नवाब मलिक म्हणाले, मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे. मी विभागा (NCB) विरोधात नाही, तर जे चुकीचे काम करत आहेत त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. लोकप्रियतेसाठी चित्रपटांत काम करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे, असा दावाही मलिक यांनी केला आहे. 

कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही पण..."कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही. पण, जे ड्रग्स घेतात, त्यांची शंका असेल तर त्यांचे रक्त, लघवीचे नमुने घ्या. चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास कोर्टात उभे करा. अशा लोकांना जामीन मिळतो. त्यात एक वर्षाची शिक्षा आहे. त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. वानखेडे यांना विभागात आणले गेले तेव्हा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण होते. त्यावरून बरेच राजकारण झाले. त्यावेळी दीपिका पदुकोण, सारा अली खान यांना लक्ष्य करण्यात आले. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी," असेही मलिक म्हणाले. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांवरही आरोप -नवाब मलिक म्हणाले, नीरज गुंडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच येथे अधिकारी आणले जातात. हे मी जबाबदारीने बोलत आहे. नीरज गुंडे सर्व कार्यालयांत बसलेला असतो.

जावयाच्या अटकेसंदर्भात काय म्हणाले मलिक -ड्रग्ज प्रकरणात आपल्या जावयाच्या अटकेसंदर्भात बोलताना नवाब मलिक म्हणाले, ते जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा साडे आठ महिने आम्ही काहीही बोललो नाही. जेव्हा फॉरेन्सिक अहवाल आला, तेव्हा त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्स नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर, त्यांना जामीन मिळाला. मात्र, जेव्हा मी यावर बोलायला सुरुवात केली, तेव्हा काही पत्रकारांनी सांगितले, की समीर वानखेडे तुमच्यावर नाराज आहे. मला त्यांच्याबद्दल सर्व काही माहित आहे, असेही मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले, वसुली केलेल्या पैशांतून समीर वानखेडे महागडे कपडे परिधान करतात. त्यांचे उत्पन्न किती आहे? एक अधिकारी दररोज दोन लाख रुपयांचे बूट कसे घालतो आणि 75 हजारांचा शर्ट कसा घालू शकतो. आम्ही एका दिवसात कोणतीही माहिती गोळा केलेली नाही. त्यांनी डीआरआय आणि कस्टममध्ये काम केले आहे. ते भ्रष्ट आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडे