शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

नौदल, तटरक्षक दल सज्ज

By admin | Updated: June 11, 2016 02:11 IST

नालेसफाईच्या कामाबाबत साशंकताच व्यक्त होत असल्याने यंदा मुंबईत पाणी भरणार नाही

मुंबई : नालेसफाईच्या कामाबाबत साशंकताच व्यक्त होत असल्याने यंदा मुंबईत पाणी भरणार नाही, याची शाश्वती महापालिकेलाही देता आलेली नाही़ त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाबरोबरच पहिल्यांदाच आर्मीच्या सहा तुकड्याही तैनात ठेवण्यात येणार आहेत़ मान्सून लवकरच मुंबईत दाखल होण्याचे संकेत आहेत़ त्यामुळे मान्सूनपूर्व कामांची रंगीत तालीम घेण्यात येत आहे़ पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यास मदतकार्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय़ ए़ कुंदन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पाण्याचा निचरा त्वरित होण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत आठ ठिकाणी पम्पिंग स्टेशन, नाल्यांचे रुंदीकरण, पर्जन्य वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली़ तरीही ताशी केवळ ५० मि़मी़ पावसाच्या पाण्याचा निचरा होत आहे़ मात्र मुसळधार पाऊस आणि समुद्रात ४़३ मीटरहून उंच लाटा उसळल्यास मुंबई जलमय होत असल्याचे चित्र कायम आहे़ (प्रतिनिधी)>पाणी तुंबण्याच्या ठिकाणांवर वॉच२३८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाणी भरणाऱ्या ठिकाणांवर नजर ठेवून आवश्यकतेनुसार मदत पुरविणे व पाण्याचा निचरा केला जाणार आहे़ तसेच २४ विभागीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत़ या कक्षाला प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळ देण्यात आले आहे़ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकगेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक बोलाविण्यात येत होते़ या वर्षीपासून हे पथक मुंबईतच तैनात करण्यात आले आहे़ त्याचबरोबर पायदळ, नौदल, भारतीय तटरक्षक दल यांच्याही तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत़धोकादायक वृक्षांवर नजरमुंबईत ५४ हजार ९४२ वृक्ष धोकादायक आहेत़ यापैकी ३३ हजार वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात आल्या आहेत़ मात्र पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचा धोका असल्याने वृक्ष अवेक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असणार आहे़तटरक्षक दल़... चार पथके तैनात, प्रत्येक पथकात चार सदस्य, कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे ही पथके तैनात, या पथकांकडे तरंगते तराफे, लाइफ जॅकेट्स, प्रथमोपचार संच आहेत़ नि:शुल्क हेल्पलाइन क्ऱ १९५४ तसेच पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडली आहेत.>पालिकेच्या पाच शाळांमध्ये तात्पुरते निवारेपर्जन्य जलवाहिन्यांच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी २९३ ठिकाणी पंपआकस्मिक खर्चाकरिता एक लाख रुपये प्रत्येक विभागासाठी उपलब्ध पुरातून नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी २० जीवरक्षक तराफे