शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानावर नवी मुंबईची मोहर,15 वर्षात स्वच्छतेचा चौथा पुरस्कार

By admin | Updated: May 4, 2017 20:53 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात 8 व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 4 - स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात 8 व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 2002 पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रतील एकूण 14 महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. 
 
दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणो व आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा पुरस्कार  स्वीकारला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नेहमीच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. 2002, 2003 व 2005 मध्ये सलग तीन वेळा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविल्यानंतर शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शहरात केलेल्या सव्रेक्षणाप्रमाणो 3398 कुटुंबे उघडय़ावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे 1935 घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालय बांधणो शक्य नाही अशा ठिकाणी 69 सामुदायिक शौचालये उभारून 719 सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी 369 सामुदायिक शौचालये व 137 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामध्ये 5567 सीट्स उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ऑक्टोबर  2014 ते जानेवारी 2017 या कालावधीमध्ये 93 सामुदायिक शौचालये, 20 ई टॉयलेट्स व महिलांसाठी 6 स्मार्ट एसएचई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. बेलापूरमधील रमाबाई आंबेडकरनगर मध्ये 53, ऐरोलीतील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे 312 अशी एकूण 365 वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. 
 
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  2015 - 16  मध्ये  65 स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व 3 लाख 25 हजार 55 मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. 2016 - 17 या वर्षामध्ये 170 विशेष मोहिमांचे आयोजन करून लोकसहभागाच्या माध्यमातून 1 लाख 65 हजार 781 मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबरोबर प्लास्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना राबविण्यात आली. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लास्टिकवर प्रक्रिया करून प्लास्टिक अॅग्लो तयार करण्यात आला. त्याचा वापर करून एमआयडीसीतील 10 रस्ते तयार करण्यात आले आहेत.
 
 कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी शहरातील 700 पैकी 200 ठिकाणच्या कम्युनिटी बिन्स काढण्यात आल्या आहेत. शहरातील 13,500 कचराकुंडय़ा व 600 कम्युनिटी बिन्समधील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला की नाही याविषयी सर्व वाहनांना जीपीएस व जीपीआरएस प्रणाली बसविण्यात आली असून त्याद्वारे नियंत्रण करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे प्रशासनाला स्वच्छ भारत अभियानामध्ये यश आले आहे. 
 
 
प्रतिक्रिया 
हा पुरस्कार नवी मुंबईकरांना समर्पित करत आहे. सफाई कामगार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश आले असून भविष्यात अजून चांगले काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. 
- सुधाकर सोनावणो,
महापौर, नवी मुंबई 
 
प्रतिक्रिया 
 
नवी मुंबईला देशातील 8 वे व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर असल्याचे मानांकन मिळाले आहे. हा बहुमान लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व नागरिकांचा आहे. भविष्यात पालिकेचे मानांकन सतत उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- रामास्वामी एन.,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका 
 
देशातील आदर्श प्रकल्प नवी मुंबईत
स्वच्छतेविषयी राज्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात आदर्श डम्पिंग ग्राउंड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घनकच:याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून देशातील सर्वात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र पालिकेने उभारलेली आहेत. कचरा उचलण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यार्पयत अत्यंत चांगली यंत्रणा असल्याने पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.